शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांची पीएच.डी नोंदणी धोक्यात? मुदत संपल्यामुळे नोंदणी रद्द होणार 

By राम शिनगारे | Published: May 02, 2024 4:33 PM

या प्रकरणी विद्यापीठाच्या निर्णयाकडे हजारो संशोधकांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग संलग्न महाविद्यालयांमध्ये पीएच.डीचे संशोधन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची नोंदणी धोक्यात आली आहे. पीएच.डी अधिनियमानुसार संशोधकांना संशोधनासाठी सहा वर्षांची दिलेली मुदत संपली असून, त्या कालावधीत संशोधन पूर्ण केले नाही, त्यांची नोंदणी आपोआप रद्द झाली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी मुदत संपल्यानंतर पुनर्नोंदणी किंवा वाढीव वेळेसाठी विद्यापीठाच्या संंबंधित प्राधिकरणांकडेही धाव घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाने १५ डिसेंबर २०२० रोजी एम.फील, पीएच.डीच्या संदर्भातील सर्व नियमावलीचा १००९ हा अधिनियम मंजूर केला आहे. या अधिनियमानुसार पूर्णवेळ पीएच.डीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी ३ वर्ष आणि जास्तीत जास्त ६ वर्षांमध्ये संशोधन पूर्ण करण्याचा नियम आहे. या अधिनियमाच्या पूर्वी विद्यापीठात ३ ऑक्टोबर २०१६ रोजीचा पीएच.डी अधिनियम लागू होता. त्यातही सहा वर्षांचीच जास्तीत जास्त मुदत दिलेली होती. मात्र, त्या अधिनियमात सहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा हवा असेल तर संशोधन मान्यता समितीला (आरआरसी) मान्यता देण्यात आलेली होती. मात्र, २०२०च्या अधिनियमात अशी मुदतवाढ देण्याचा नियमच केलेला नसल्याचे दिसून आले आहे. तसेच हे दोन्ही अधिनियम लागू होण्यापूर्वीपासून विद्यापीठाकडे शेकडो विद्यार्थी अद्यापही पीएच.डीचे संशोधन करीत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काय होणार, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२०१४ पूर्वीची नोंदणी कालबाह्य का?विद्यापीठातील पीएच.डी विभागाकडे २०२४ पूर्वी नोंदणी केलेले काही संशोधन प्रबंध जमा झाले आहेत. काहींच्या संशोधन प्रबंधांचे बहि:स्थ अहवाल प्राप्त झाले असून, काहींचा अंतिम गोषवारा सादर केला आहे. या विद्यार्थ्यांची मुदत संपलेली असल्यामुळे त्यावर संबंधित विभाग काहीच निर्णय घेत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे २०१४ पूर्वी पीएच.डी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, बोर्ड ऑफ डीन, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेत निर्णय घेऊन संशोधक विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

संशोधनासाठी कालावधी निश्चित २०१४ पूर्वी नोंदणी केलेली आणि त्यांनी पुनर्नोंदणी केलेली नाही, अशी काही प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. विद्यापीठाच्या अधिनियमानुसार पीएच.डी संशोधनासाठी कालावधी निश्चित केलेला आहे. त्या कालावधीत संशोधन पूर्ण झाले नसेल तर संबंधित प्राधिकरणांकडून संशोधकांना पुनर्नोंदणी करावी लागेल. जे पुनर्नोंदणी करणार नाहीत, त्यांची नोंदणी आपोआप रद्दच होते.-डॉ. वाल्मीक सरवदे, प्र-कुलगुरु

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद