शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

नियम डावलून विंधन विहिरी घेण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:32 IST

पाणीटंचाईत नको त्या ठिकाणी शेकडो छिद्र जमिनीला पाडण्याकडे जनतेचा भर

औरंगाबाद : पर्जन्यमान कमी असल्याने भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतापासून खाजगी विहीर किमान ५०० मीटरवर असावी. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पत्र घ्यावे लागते; परंतु नियम डावलून पाणीटंचाईत नको त्या ठिकाणी शेकडो छिद्र जमिनीला पाडण्याकडे जनतेचा भर असल्याचे दिसून येत आहे. 

सरकारी योजनेतील विहीर तसेच बोअरवेल खोदण्यासाठी नियम व अटी घालून दिल्या असून, त्यानुसारच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याच्या देखरेखीखाली कामे करून घेतली जातात; परंतु खाजगी विहीर व बोअरवेलधारक हे मनपा तसेच जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांकडून कोणताही परवाना न घेता खाजगी जागेवर बोअर मारून पाणी उपसा करतात. 

भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली असली तरी जमिनीत विहीर व बोअरवेल पुनर्भरण करण्यावर भर देण्यात आला आहे; परंतु गत पाच वर्षांत पावसाचे प्रमाण अल्प असल्याने पाण्याची पातळी जमिनीत वाढण्याऐवजी दर वर्षाला दोन मीटरने खालावली आहे. ही सत्यता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नाची गंभीरता लक्षात येत आहे.  

परवानगी दोनशे फुटांची खोली साडेतीनशेपर्यंत कोरडीचशासकीय यंत्रणेकडून फक्त दोनशे फुटांपर्यंतच बोअरवेल घेता येतो; परंतु हट्टापायी भूगर्भात तीनशे ते साडेतीनशे फुटांपर्यंत बोअरवेल घेतला जात आहे. ग्रामीण व शहरातील सातारा, देवळाई, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, चितेगाव एमआयडीसी परिसरातील लोकवसाहतीत पाणीटंचाई वाढली आहे. पाण्यासाठी बोअरवेलचा अनेकांचा खर्च व्यर्थ जात असून, टँकरच्या पाण्याकडे वळावे लागत आहे. शहराच्या लगतही नदीलगतच्या परिसरात पाणीपुरवठा बऱ्यापैकी मिळतो; परंतु जे बोअर उन्हाळ्यात कधी आटले नाहीत त्या बोअरने तळ गाठला आहे, याचा परिणाम भीषण पाणीटंचाई समोर आली आहे.

जनमताचा अहवाल पाठविलापाणी अडवा, पाणी जिरवा, बोअर, विहीर पुनर्भरण तसेच पाण्याचे व्यवस्थापन करून पाणीटंचाईवर मात करता येते. पाणी उपशाविषयीही नियम शासकीय दृष्टिपथात यावा म्हणून जनमत मागवून त्याचा अहवाल मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे उपसंचालक डॉ. पी. एल. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविला आहे, असे भूजल विभागाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीAurangabadऔरंगाबाद