शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

नियम डावलून विंधन विहिरी घेण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:32 IST

पाणीटंचाईत नको त्या ठिकाणी शेकडो छिद्र जमिनीला पाडण्याकडे जनतेचा भर

औरंगाबाद : पर्जन्यमान कमी असल्याने भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतापासून खाजगी विहीर किमान ५०० मीटरवर असावी. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पत्र घ्यावे लागते; परंतु नियम डावलून पाणीटंचाईत नको त्या ठिकाणी शेकडो छिद्र जमिनीला पाडण्याकडे जनतेचा भर असल्याचे दिसून येत आहे. 

सरकारी योजनेतील विहीर तसेच बोअरवेल खोदण्यासाठी नियम व अटी घालून दिल्या असून, त्यानुसारच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याच्या देखरेखीखाली कामे करून घेतली जातात; परंतु खाजगी विहीर व बोअरवेलधारक हे मनपा तसेच जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांकडून कोणताही परवाना न घेता खाजगी जागेवर बोअर मारून पाणी उपसा करतात. 

भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने घट झाली असली तरी जमिनीत विहीर व बोअरवेल पुनर्भरण करण्यावर भर देण्यात आला आहे; परंतु गत पाच वर्षांत पावसाचे प्रमाण अल्प असल्याने पाण्याची पातळी जमिनीत वाढण्याऐवजी दर वर्षाला दोन मीटरने खालावली आहे. ही सत्यता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नाची गंभीरता लक्षात येत आहे.  

परवानगी दोनशे फुटांची खोली साडेतीनशेपर्यंत कोरडीचशासकीय यंत्रणेकडून फक्त दोनशे फुटांपर्यंतच बोअरवेल घेता येतो; परंतु हट्टापायी भूगर्भात तीनशे ते साडेतीनशे फुटांपर्यंत बोअरवेल घेतला जात आहे. ग्रामीण व शहरातील सातारा, देवळाई, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, चितेगाव एमआयडीसी परिसरातील लोकवसाहतीत पाणीटंचाई वाढली आहे. पाण्यासाठी बोअरवेलचा अनेकांचा खर्च व्यर्थ जात असून, टँकरच्या पाण्याकडे वळावे लागत आहे. शहराच्या लगतही नदीलगतच्या परिसरात पाणीपुरवठा बऱ्यापैकी मिळतो; परंतु जे बोअर उन्हाळ्यात कधी आटले नाहीत त्या बोअरने तळ गाठला आहे, याचा परिणाम भीषण पाणीटंचाई समोर आली आहे.

जनमताचा अहवाल पाठविलापाणी अडवा, पाणी जिरवा, बोअर, विहीर पुनर्भरण तसेच पाण्याचे व्यवस्थापन करून पाणीटंचाईवर मात करता येते. पाणी उपशाविषयीही नियम शासकीय दृष्टिपथात यावा म्हणून जनमत मागवून त्याचा अहवाल मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे उपसंचालक डॉ. पी. एल. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविला आहे, असे भूजल विभागाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीAurangabadऔरंगाबाद