शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सात मित्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:41 IST

या दुर्घटनेने दौलताबाद व शरणापूर या गावांसह परिसरातील गावेही शोकसागरात बुडाली आहेत.

ठळक मुद्देपर्यटनासाठी जात असताना बेळगावनजीक गाडीचे टायर फुटून झाला अपघात सातही तरुण सामाजिक कार्यात होते अग्रेसर 

दौलताबाद/शरणापूर (औरंगाबाद )  : बेळगावनजीक रविवारी दुपारी झालेल्या अपघातातील ठार झालेल्या सात तरुणांचे मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान दोन रुग्णवाहीकांमध्ये गावात आणण्यात आले.सुरुवातीला  दोन मृतदेह दौलताबाद येथे मृतांच्या नातेवाईकांकडे स्वाधीन करण्यात आले. यानंतर रुग्णवाहिका थेट दौलताबाद येथील स्मशानभूमीत नेण्यात आली. येथे पाच मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची ग्रामस्थांनी तयारी करून ठेवली होती. सातही तरुणांवर लागलीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेने दौलताबाद व शरणापूर या गावांसह परिसरातील गावेही शोकसागरात बुडाली असून, सातही मित्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. 

गोपी कडूबा वरकड (३०), महेश नंदू पाडळे  (२४, दोघे रा. गवळीवाडा, दौलताबाद), अमोल हरिश्चंद्र निळे (२४), अमोल चावरे (२४), रवींद्र मच्छिंद्र वाडेकर (२५), सुरेश कैलास कान्हेरे (२५), नंदू किसन पवार (२५, सर्व रा. शरणापूर) हे सात जिवलग मित्र गोवा येथे पर्यटनासाठी जात असताना बेळगावनजीकअपघातात ठार झाल्याचे वृत्त येताच दौलताबाद व शरणापूर ही गावे सुन्न झाली आहेत. मृतांच्या कुटुंबांच्या घरात आक्रोश सुरू असून, ग्रामस्थ त्यांना धीर देत आहेत. मंगळवारी सकाळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या दोन वातानुकुलीत रुग्णवाहीकांमध्ये सातही युवकांची मृतदेह गावात आणण्यात आली. गावकऱ्यांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची सर्व तयारी करून ठेवली होती. तसेच सर्व ग्रामस्थ आणि तरुणांचे नातेवाईक आधीच येथे उपस्थित होते. सुरुवातीला दौलताबाद येथे दोन मृतदेह नातेवाईक व ग्रामस्थांच्या स्वाधीन करून रुग्णवाहिका थेट दौलताबाद येथील स्मशानभूमीत दाखल झाल्या. येथे उर्वरित पाच मृतदेह तरुणांच्या व ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्यात आले. रुग्णवाहीका दिसताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सातही तरुणांवर लागलीच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्याप्रमाणावर उपस्थित होती. दरम्यान, दौलताबाद आणि शरणापूर गावात बंद पाळण्यात आला आहे.  

सातही तरुण सामाजिक कार्यात होते अग्रेसर हे सातही तरुण मित्र गावातील कोणतेही सामाजिक कार्य असो त्यात हिरीरीने सहभाग घेत होते, तसेच राजकीय क्षेत्रातही ते सक्रिय होते. गोपी वरकड हा काँग्रेसचा कार्यकर्ता होता. तो घरातील कर्ता मुलगा होता. चार दिवसांपूर्वी त्याने लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता. महेश पाडळे हा तरुणांच्या गळ्यातील ताईत होता. तो सोशल मीडियावर सतत कार्यरत असायचा.

दोन तरुण एकुलते एक शरणापूर येथील अमोल व रवी हे दोन तरुण आई-वडिलांना एकुलते एक होते, तर नंदू पवार याच्या धाकट्या भावाचाही दोन वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. आता नंदूही गेल्याने पवार कुटुंबाचे पुत्रछत्रच हरपले आहे. दोन्ही मुले अपघातात गेल्याने नंदूचे वडील अबोल झाले असून, त्यांना सांभाळणे कठीण झाले आहे. आता त्यांना केवळ एकच मुलगी आहे.

दोन दिवसांपासून ग्रामस्थांना झोप नाहीरविवारपासून दोन्ही गावांतील नागरिकांची झोप उडाली असून, ते हळहळ व्यक्त करीत आहेत. रमजान महिन्यानिमित्त रात्री दौलताबाद येथील जामा मशीदमधील कार्यक्रम लवकर आटोपून सर्व मुस्लिम बांधवही या तरुणांच्या घरी रात्रभर जागून नातेवाईकांना धीर देत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAurangabadऔरंगाबादbelgaonबेळगाव