शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांच्या गावच्याच लोकांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी रचला नातीच्या अपहरणाचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:51 IST

आजोबांच्या आलिशान गाड्या, प्रॉपर्टी पाहून गावच्या लोकांनी रचला डाव,

छत्रपती संभाजीनगर : खासगी शिकवणी संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीचा चार आरोपींनी कारमधून अपहरणाचा प्रयत्न बुधवारी (दि. १५) केला हाेता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली. शहर पोलिसांच्या दहापेक्षा अधिक पथकांनी राताेरात आरोपींची ओळख पटवत दोघांना बेड्या ठाेकल्या. अपहरणकर्ते व मुलीचे आजोबा एकाच गावचे असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्या मुलीच्या आजोबाकडून दीड कोटी रुपये खंडणी उकळण्यासाठी हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समाेर आली.

अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप उर्फ पप्पू साहेबराव पवार (३२, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) आणि बाबासाहेब अशोक मोरे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) यांचा समावेश आहे. या घटनेचा मास्टरमाइंड गणेश ज्ञानेश्वर मोरे आणि बळीराम उर्फ भय्या मोहन महाजन (दोघेही रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) हे फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखा, सायबर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासह झोन-२मधील डीबी पथकांना कामाला लावले होते.

घटनास्थळी सोडलेली गाडी, गाडीतील नंबर प्लेट, सीसीटीव्ही फुटेजसह मुलगी, चालकाच्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार आरोपीच्या गावी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांचे पथक पाठविले. पथक गावात पोहचल्यानंतर गुन्ह्यातील दोन आरोपी अंबड - पाचोड रस्त्यावरील पिंपरखेड येथील हॉटेल लोकसेवा येथे जेवण करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने हॉटेलमधून दोन आरोपींना ताब्यात घेतले. शहरात आणल्यानंतर चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, कृष्णा शिंदे, शिवचरण पांढरे, सहायक निरीक्षक विनायक शेळके, रविकांत गच्चे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, नवनाथ पाटवदकर, विशाल बोडके, प्रवीण वाघ यांच्या पथकांनी केली.

कुटुंबाला दिले संरक्षणअपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या कुटुंबाला शहर पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या प्रकरणाशी साधर्म्यबांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चैतन्य तुपे याच्या अपहरणानंतर आरोपींनी फोन करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या घटनेतील आरोपी आलना जिल्ह्यातीलच होते. त्यांनी बाहेरून येऊन अपहरण केले होते. बुधवारी घडलेल्या घटनेतही आरोपी जालना जिल्ह्यातीलच असून, त्यांनीही दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा कट होता. तसेच यात मुलीचे आजोबा हे जमीन व्यावसायिक आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर