शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वंशावळ शंभरीच्या उंबरठ्यावर !

By admin | Updated: August 18, 2015 00:06 IST

संजय तिपाले , बीड चारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील

संजय तिपाले , बीडचारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एका शेतकरी कुटुंबाने गुरांच्या रक्षणाचे व्रत स्वीकारले आहे. एका गाईपासून सुरु झालेली गोसेवेची परंपरा आज तिसरी पिढीही तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहे. दुष्काळी परिस्थितीतही ते स्वत:कडील नव्वदपेक्षा अधिक व इतरांनी आणून सोडलेल्या वीस ते पंचवीस जनावरांचा सांभाळ करत आहेत.कडाजीराव कोंडीबा जाधव यांचे पवारवाडी शिवारातील देवकृपानगरात शेत आहे. त्यांचे वडील दिवंगत कोंडीबाराव जाधव यांनी ४० वर्षांपूर्वी गुंजथडी (ता. माजलगाव) येथील शेतकऱ्याकडून तांबड्या रंगाची गाय ४०० रुपयांत विकत आणली होती. अंगापिंढाने मजबूत असलेल्या या गाईचे पहिले वेत जाधव यांच्याचकडे झाले. या गाईला ते खूप जीव लावत. वासरांचाही कोंडीबाराव यांना पोटच्या लेकरागत लळा. त्यांनी ठरवले या गाईचे जित्राब अन् दूध कधीच विकायचे नाही. वासरू होवो अथवा कालवड दोन्हींचा ते आंनदाने सांभाळ करत. त्यामुळे गायीची वंशावळ वाढत गेली अन् गोठ्याला नंदनवनाचे स्वरुप येत गेले. २२ वर्षांपूर्वी गाय दगावली तेंव्हा घरातील माणूस गेल्याचे दु:ख जाधव कुटुंबियांना झाले होते. २००९ मध्ये कोंडीबाराव जाधव यांचे निधन झाले. कडाजीराव जाधव यांनी या गायीच्या वासराला पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावला. वडिलांनी गाईला आईप्रमाणे लावलेले प्रेम कडाजीराव यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांनी गोसेवेत कशाचीही कमी पडू दिली नाही. आता अप्पासाहेब, विठ्ठलराव तसेच मुंजाबा ही त्यांची तीन मुलेही त्यांना याकामी मदत करतात. गोसेवेला व्यापक स्वरुप देण्यासाठी जाधव यांनी गोठ्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दोन पूर्णवेळ मजूरही दिमतीला आहेत.एका गुराला महिन्याकाठी सर्वसाधारणे ८ क्विंटल ४० किलो चारा लागतो. जाधव यांच्या गोठ्यात १०० पेक्षा जास्त गुरे आहेत. त्यासाठी २५ लाख मेट्रीक टन चाऱ्याची महिन्याकाठी गरज भासते. आपल्या सात एकर शेतात त्यांनी घास, मका, ज्वारी, बाजरी पेरून चाऱ्याची तरतूद केली आहे. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी दोन विहिरीतील पाणी चारा जगविण्यासाठी ठिबकद्वारे सोडले. जनावरांचे मूत्र पाईपद्वारे लगतच्या हौदात सोडले आहे. त्याला जोडूनच शेण साठविले जाते. शेण व मूत्र एकत्रित करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करतात. हेच खत नंतर शेतात वापरले जाते.गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे. माझ्या वडिलांनी आणलेल्या गायीची वंशावळ ९० च्या पुढे गेल्याचे पाहून आनंद होतो. मुलेही मोठ्या परिश्रमाने गुरांचा सांभाळ करतात. परिसरातील शेतकरी आपली गुरे आणून सोडत आहेत. दुष्काळी स्थितीत या गुरांचाही सांभाळ करायचा आहे. - कडाजीराव जाधव, शेतकरी