पगारवाढ रखडली
By Admin | Updated: February 9, 2016 00:33 IST2016-02-09T00:21:26+5:302016-02-09T00:33:13+5:30
संतोष हिरेमठ ,औरंगाबाद महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी डिसेंबरमध्ये बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते.

पगारवाढ रखडली
संतोष हिरेमठ ,औरंगाबाद
महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी डिसेंबरमध्ये बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. परिवहन मंत्र्यांशी केलेल्या चर्चेत जानेवारीपासून पगारवाढ देण्याचे आश्वासन मिळाल्याने संप स्थगित करताना संघटनेतर्फे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात नुकत्याच झालेल्या पगारामध्ये ही वाढ न झाल्याने हजारो एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले.
एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार कमी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, (पान २ वर)
परिवहन मंत्र्यांनी दिलेला शब्द फिरविला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा संप पुकारण्यात येणार आहे. पगारवाढ मिळाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.
- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)
कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. त्यामुळे संप करणाऱ्या संघटनेने पगारवाढ मिळणार असल्याचे जाहीर करून कामगारांची एकप्रकारे फसवणूक केली. ३१ मार्चला करार संपत आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे.
- हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना
संघटना या मागण्या करीत असतात. परंतु चर्चेच्या वेळी पगारवाढीसंदर्भात संघटनेला कोणतेही आश्वासन दिले नव्हते. संघटनेने बिनशर्त संप मागे घेतला होता. आश्वासनाबाबत सांगत असतील तर त्या भूलथापा आहेत.
-दिवाकर रावते, परिवहनमंत्री