पायलच्या कुटुंबियांनी अखेर गाव सोडले
By Admin | Updated: May 24, 2014 01:41 IST2014-05-24T01:15:55+5:302014-05-24T01:41:14+5:30
फकिरा देशमुख, भोकरदन वालसावंगी ग्रामस्थांना सलग पाच वर्षे रुग्णसेवा देणार्या डॉ. अनिल वाघमारे यांनी अखेर गुरुवारी गावचा निरोप घेतला.
पायलच्या कुटुंबियांनी अखेर गाव सोडले
फकिरा देशमुख, भोकरदन वालसावंगी ग्रामस्थांना सलग पाच वर्षे रुग्णसेवा देणार्या डॉ. अनिल वाघमारे यांनी अखेर गुरुवारी गावचा निरोप घेतला. तिथे राहायचे तर नाहीच. त्या गावात नोकरीही करायची नसल्याचे वाघमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दीड लाखाच्या खंडणीसाठी त्यांची सहा महिन्यांची मुलगी पायल हिचा जीव घेतला. ज्या गावकर्यांसाठी जिवाचे रान केले, त्यातल्याच पाच जणांनी असा घात केल्याने वाघमारे कुटुंब उस्मानाबाद या मूळगावी परतले. वालसांवगी येथील प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी असलेले वाघमारे यांच्या कुटुंबासाठी १९ मे हा काळा दिवस ठरला. खंडणीसाठी अपहरण करून पायलचा निघृणपणे खून झाला. पायलला संभाळण्याचे काम करणार्या लक्ष्मी सोनुने या ८ वर्षांच्या मुलीच्या अंगाला दगड बांधून जिवंत विहिरीत टाकून तिलाही संपविण्यात आले. पाच वर्षांपासून या गावात आम्ही गुण्यागोविंदाने राहत होतो. तसेच नोकरी करीत असताना माझा कोणाशी कधीही वाद झाला नाही. भांडण झाले नाही. गावातील नागरिक चांगले होते. त्यामुळे बदली करून जावे, असे कधीही वाटले नाही. आता मात्र या गावात राहायचा प्रश्नच नाही. तिथे नोकरीही करायची नाही. मी बदलीसाठी अर्ज करणार असल्याचे वाघमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पत्नी रेश्मा, मुलगा राजू व मुली पायल, अक्षदा असे पाच जणांचे अनिल वाघमारे यांचे कुटुंब. पाच वर्षे त्यांनी याच गावात रूग्णसेवा केली. मात्र पाच जणांनी पायलची हत्या करुन त्यांच्या सेवेची अशी परतफेड केली.