शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कर वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; औरंगाबाद मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:10 PM

महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्‍यांना दिला.

ठळक मुद्देमालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी देण्यात आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत ३१ मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना १४० कर्मचारी देण्यात आले आहेत. आता कर्मचारी नाहीत, अशी ओरड बंद झाली आहे. काहीही करा वसुली जास्तीत जास्त झालीच पाहिजे असा इशारा आयुक्तांनी दिला

औरंगाबाद : महापालिकेची तिजोरी रिकामी झाल्याने मालमत्ता कर, पाणीपट्टीवर सर्वाधिक लक्ष देण्यात येत आहे. पन्नास कामे सोडून वसुलीकडे गांभीर्याने लक्ष द्या अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकार्‍यांना दिला. मोठ्या थकबाकीदारांकडून सक्तीने वसुली करा, असे आदेश देण्यात आले.

मालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी देण्यात आले आहे. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना १४० कर्मचारी देण्यात आले आहेत. आता कर्मचारी नाहीत, अशी ओरड बंद झाली आहे. काहीही करा वसुली जास्तीत जास्त झालीच पाहिजे असा इशारा आयुक्तांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एका बैठकीत दिला. वॉर्ड अधिकार्‍यांना जोमाने काम करण्याचा सल्ला आयुक्तांनी आपल्या पद्धतीने दिला. वसुली कमी झाल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांचा पगार तीन महिने होणार नाही, असा इशारा देण्यात आला. वर्षअखेरीस सर्वात कमी वसुली असलेल्या अधिकार्‍याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

पाणीपट्टीत ८० कोटींची तूटसमांतर जलवाहिनीचे काम करणार्‍या कंपनीने अवघ्या १४ महिन्यांमध्ये शहरातून तब्बल ९० कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली होती. मागील वर्षी महापालिकेने पाणीपट्टी फक्त ३६ कोटी वसूल केली. यंदा तर वसुलीने अधिकच तळ गाठला आहे. नऊ महिन्यांमध्ये फक्त ९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. येणार्‍या अडीच महिन्यांमध्ये जास्तीत जास्त पाणीपट्टी वसूल करण्याचे मोठे आव्हान मनपाच्या वॉर्ड अधिकार्‍यांसमोर आहे.

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळाAurangabadऔरंगाबाद