शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:11 IST

भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक; अजित पवारांच्या विरोधात कट; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि ओबीसी प्रतिनिधी विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवताना केलेल्या '३७४ जातीच्या लोकांना समुद्रात बुडवावे' या वादग्रस्त वक्तव्यावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जरांगे यांनी थेट शरद पवार यांच्यापासून छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यावर हल्ला चढवत, 'ओबीसी समाजाचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केला आहे,' असा गंभीर आरोप केला आहे.

वडेट्टीवारांवर सडेतोड पलटवारपत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, "ओबीसीच्या ३७४ जाती नेमक्या कोणी संपवल्या, यावर ओबीसी समाजाने चिंतन करायला हवे. ओबीसींचा घात हा येवल्याच्या अलिबाबाने (भुजबळ) आणि आता वडेट्टीवार आणि पूर्वीचे नेते यांनी केला आहे." वडेट्टीवार यांचा 'सत्तेची दादागिरी' हा आरोप फेटाळताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, मराठा आरक्षणाची प्रत्येक मागणी हैदराबाद गॅझेट आणि नियमांच्या आधारावर केलेली आहे.

'शरद पवारांनी आमचं वाटोळं केलंच'यावेळी मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही थेट टीका केली. १९९४ साली मराठ्यांचे हक्काचे १६ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात आले, त्यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले. "ज्यांनी १९९४ ला १६ टक्के आरक्षण आम्हाला दिले, उदाहरणार्थ शरद पवारांनी... त्यांनी आमचं वाटोळं केलंच समजा. पण त्याच पवारांनी यांचेही (ओबीसी नेते) उपकार ठेवले नाहीत, याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक ओबीसीच्या नेत्यानेच केली आहे," असे जरांगे म्हणाले.

भुजबळ आणि वडेट्टीवारांवर 'षडयंत्रा'चा आरोपजरांगे यांनी छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे एकत्र येऊन राजकारण करत असल्याचा आणि जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसकडे घ्यावे, यासाठी वडेट्टीवार यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याचा दावाही त्यांनी केला. याचबरोबर, जरांगे यांनी अजित पवार यांच्यावरही मोठे षडयंत्र सुरू असल्याचा दावा केला. "हा (भुजबळ) माणूस जातीयवादाच्या दंगली लावू शकतो. शिवसेना प्रमुख, अजित पवार यांच्या डोक्यात झोपेत दगड घातला. हे त्यांना (शिंदे-अजित पवार-फडणवीस यांना) संपवतील," असा इशारा जरांगे यांनी दिला.

शेतकऱ्यांसाठी टोकाचा लढा आणि काँग्रेसवर टीकाहैदराबाद गॅझेटचा जीआर नियमानुसार निघाला असून तो रद्द होऊ शकत नाही, त्यामुळे मराठा बांधवांनी प्रमाणपत्रासाठी तयारी करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच, त्यांनी काँग्रेससारख्या पक्षांना मराठ्यांनी मोठे करू नये, असे आवाहन करत दिवाळीपर्यंत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत न मिळाल्यास मराठा आरक्षणासारखाच 'टोकाचा अंतिम लढा' उभा करण्याचा इशाराही राज्य सरकारला दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange Slams Pawar, OBC Leaders for Maratha Quota Mishandling

Web Summary : Manoj Jarange Patil accuses Sharad Pawar and OBC leaders like Bhujbal and Vadettiwar of betraying both Maratha and OBC communities regarding reservation issues. He alleges conspiracies and threatens further agitation for farmers.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSharad Pawarशरद पवारOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण