शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:10 IST

दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान : प्रवाशांनी उपोषणाचा पवित्रा घेताच तत्काळ विमानाची व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर झाल्याने संताप व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह शहरात येणाऱ्या प्रवाशांनी दिल्लीविमानतळ आंदोलन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यामुळे दिल्ली विमानतळावर काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी उपोषणाचा पवित्रा घेताच तत्काळ विमानाची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

‘इंडिगो’चे दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान दररोज दिल्लीहून सायंकाळी ४:४५ वाजता उड्डाण घेते आणि ६:३० वाजता शहरात दाखल होते. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता दिल्लीसाठी उड्डाण घेतले. मात्र, दिल्लीहून येणाऱ्या या विमानास गुरुवारी उशीर झाला. विमानाची वेळ उलटूनही प्रवासी विमानतळावरच होते. याच विमानातून शहरात येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड हेदेखील दिल्ली विमानतळावर होते. विमानाला उशीर होत असल्याचे पाहून त्यांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, कोणतेही समाधानकारक उत्तर देत नसल्याचे पाहून त्यांनी विमानतळावर आंदोलन सुरू केले. इतर प्रवासीदेखील त्यांच्यासोबत आले. प्रवाशांचा संताप वाढताच विमानाची व्यवस्था करण्यात आली.

कारण सांगितले नाही, उपोषणाला बसलोविमान १० मिनिटांत येईल, असे वारंवार सांगून विलंब केला जात होता. विमानाला का उशीर होत आहे, याची विचारणा केल्यावर काहीही सांगितले जात नव्हते. त्यामुळे दिल्ली विमानतळावर उपोषणाला बसलो. तेव्हा इतर प्रवासीही माझ्यासोबत बसले. मला अटक करण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यानंतर तत्काळ विमानाची व्यवस्था करण्यात आली. हे विमान सायंकाळी ७:१० वाजेच्या सुमारास शहरात आले. वेळ वाचविण्यासाठी विमानाने प्रवास केला जातो. त्यामुळे विनाकारण विलंब होता कामा नये.-फुलचंद कराड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

नागपूर, मुंबई विमानालाही उशीरइंडिगोच्या नागपूर विमानाला जवळपास दीड तास उशीर झाला. सायंकाळी ४:४० वाजता उड्डाण घेणाऱ्या विमानाने सायंकाळी ६ वाजता उड्डाण घेतले. त्याबरोबर मुंबई विमानालाही उशीर झाला. इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादpassengerप्रवासीdelhiदिल्ली