शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

टीईटी परीक्षा दिली दीड वर्षापूर्वी, उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळाताहेत आता

By विजय सरवदे | Updated: April 8, 2023 19:25 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ हजारांपैकी फक्त ७६२ उमेदवार उत्तीर्ण

छत्रपती संभाजीनगर : दीड वर्षापूर्वी दिलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण झालेल्या डीएड, बीएड धारक उमेदवारांना गुरुवापासून प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात १९ हजारांपैकी उत्तीर्ण झालेल्या अवघ्या ७६२ उमेदवारांची प्रमाणपत्रे वितरणासाठी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहेत.

शिक्षक पदासाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याने राज्यातील लाखो डीएड, बीएड धारक उमेदवार या परीक्षेला प्रविष्ट होतात. कोरोनामुळे राज्य परीक्षा परिषदेला २०१९ पासून शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) नियोजन करता आले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला होता.

२१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल परीक्षा परिषदेने २१ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर केला. इयत्ता पहिली ते पाचवी गटासाठी (पेपर एक) ११ हजार ४६६ उमेदवारांनी, तर इयत्ता सहावी ते आठवी गटासाठी (पेपर दोन) ८ हजार ४९० उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. पहिल्या गटात ४६०, तर दुसऱ्या गटात ३०२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी अवघी ३.८ एवढी आहे.

प्राथमिक शिक्षण विभागात ६, १० व ११ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी वाजेपर्यंत टीईटी उत्तीर्णांना प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र, ऑनलाइन गुणपत्रिका, जात वैधता प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत घेऊन प्राथमिक शिक्षण विभागात संबंधितांना जावे लागणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद