शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, दुष्काळजन्य परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी: कपिल पाटील

By विजय सरवदे | Updated: August 14, 2023 15:24 IST

राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यावर पाण्याचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, तर आता अवर्षणप्रवण भागांचा दौरा करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी जनता दलाचे (युनायटेड) महासचिव आ. कपिल पाटील यांनी आज येथे केली.

एका खासगी कार्यक्रमासाठी आ. कपिल पाटील शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे. शेती आणि उद्योगांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. त्यामुळे आता सत्तासंघर्षाचा खेळ संपलेला असेल, तर भयावह स्थिती निर्माण होण्यापूर्वीच सरकारने अवर्षणप्रवण भागांचा दौरा करावा व श्वेतपत्रिका जाहीर करावी. श्वेतपत्रिकेमुळे दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना करता येतात.

देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध पक्षांची ‘इंडिया’ या नावाने आघाडी तयार झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज पक्ष सहभागी झाले आहेत. या दृष्टीकोनातून राज्यात जनता दलाचा विचार मानणारे अनेक घटक विखुरलेले आहेत. त्यांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत या संदर्भात एक बैठक झाली आहे. यासाठी कोकण भागाची जबाबदारी जेडीयूचे प्रदेश कार्याध्यक्ष अतुल देशमुख, तर मराठवाड्याची अजित शिंदे यांच्याकडे आहे. राज्यात प्रकाश आंबेडकरांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना सोडून चालणार नाही. त्यांना विश्वासात घ्यावेच लागेल. याबाबत श्रेष्ठी विचार करत आहेत.

... नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावारोजगार, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून सरकारमधील मंडळी महाआरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. अशी शिबिरे तर लायन्स, रोटरी क्लब आयोजित करतात. एक तर या मंडळींनी सरकार चालवावे, नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावा. आरोग्य, शिक्षण, रोजगार देणे हे तर शासनाचे काम असते. त्यासाठी मेळावे घेण्याची काय गरज, असा प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलAurangabadऔरंगाबादRainपाऊस