शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, दुष्काळजन्य परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी: कपिल पाटील

By विजय सरवदे | Updated: August 14, 2023 15:24 IST

राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यावर पाण्याचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, तर आता अवर्षणप्रवण भागांचा दौरा करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी जनता दलाचे (युनायटेड) महासचिव आ. कपिल पाटील यांनी आज येथे केली.

एका खासगी कार्यक्रमासाठी आ. कपिल पाटील शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे. शेती आणि उद्योगांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. त्यामुळे आता सत्तासंघर्षाचा खेळ संपलेला असेल, तर भयावह स्थिती निर्माण होण्यापूर्वीच सरकारने अवर्षणप्रवण भागांचा दौरा करावा व श्वेतपत्रिका जाहीर करावी. श्वेतपत्रिकेमुळे दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना करता येतात.

देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध पक्षांची ‘इंडिया’ या नावाने आघाडी तयार झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज पक्ष सहभागी झाले आहेत. या दृष्टीकोनातून राज्यात जनता दलाचा विचार मानणारे अनेक घटक विखुरलेले आहेत. त्यांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत या संदर्भात एक बैठक झाली आहे. यासाठी कोकण भागाची जबाबदारी जेडीयूचे प्रदेश कार्याध्यक्ष अतुल देशमुख, तर मराठवाड्याची अजित शिंदे यांच्याकडे आहे. राज्यात प्रकाश आंबेडकरांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना सोडून चालणार नाही. त्यांना विश्वासात घ्यावेच लागेल. याबाबत श्रेष्ठी विचार करत आहेत.

... नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावारोजगार, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून सरकारमधील मंडळी महाआरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. अशी शिबिरे तर लायन्स, रोटरी क्लब आयोजित करतात. एक तर या मंडळींनी सरकार चालवावे, नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावा. आरोग्य, शिक्षण, रोजगार देणे हे तर शासनाचे काम असते. त्यासाठी मेळावे घेण्याची काय गरज, असा प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलAurangabadऔरंगाबादRainपाऊस