शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, दुष्काळजन्य परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी: कपिल पाटील

By विजय सरवदे | Updated: August 14, 2023 15:24 IST

राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यावर पाण्याचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने पक्षफोडीचे राजकारण संपले असेल, तर आता अवर्षणप्रवण भागांचा दौरा करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी जनता दलाचे (युनायटेड) महासचिव आ. कपिल पाटील यांनी आज येथे केली.

एका खासगी कार्यक्रमासाठी आ. कपिल पाटील शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. धरणे भरलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावणार आहे. शेती आणि उद्योगांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. त्यामुळे आता सत्तासंघर्षाचा खेळ संपलेला असेल, तर भयावह स्थिती निर्माण होण्यापूर्वीच सरकारने अवर्षणप्रवण भागांचा दौरा करावा व श्वेतपत्रिका जाहीर करावी. श्वेतपत्रिकेमुळे दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना करता येतात.

देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध पक्षांची ‘इंडिया’ या नावाने आघाडी तयार झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज पक्ष सहभागी झाले आहेत. या दृष्टीकोनातून राज्यात जनता दलाचा विचार मानणारे अनेक घटक विखुरलेले आहेत. त्यांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत या संदर्भात एक बैठक झाली आहे. यासाठी कोकण भागाची जबाबदारी जेडीयूचे प्रदेश कार्याध्यक्ष अतुल देशमुख, तर मराठवाड्याची अजित शिंदे यांच्याकडे आहे. राज्यात प्रकाश आंबेडकरांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना सोडून चालणार नाही. त्यांना विश्वासात घ्यावेच लागेल. याबाबत श्रेष्ठी विचार करत आहेत.

... नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावारोजगार, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून सरकारमधील मंडळी महाआरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. अशी शिबिरे तर लायन्स, रोटरी क्लब आयोजित करतात. एक तर या मंडळींनी सरकार चालवावे, नाही तर रोटरीसारखा क्लब चालवावा. आरोग्य, शिक्षण, रोजगार देणे हे तर शासनाचे काम असते. त्यासाठी मेळावे घेण्याची काय गरज, असा प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलAurangabadऔरंगाबादRainपाऊस