शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

किमान तीन प्रवासी हवे; दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नसल्याची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 14:48 IST

Partial Lockdown in Aurangabad दोनपेक्षा अधिक प्रवासी आणि मास्क नसेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सक्त सूचना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केल्या.

ठळक मुद्देदोनच प्रवासी नेणारे रिक्षाचालक : शहराची आम्हालाही काळजी जास्त प्रवासी नेणारे रिक्षाचालक : कुटुंबाला कसे सांभाळायचे ?

औरंगाबाद : अंशत: लाॅकडाऊन पहिल्याच दिवशी गुरुवारी जालना रोडवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षांचे प्रमाण काहीसे कमी राहिले. कारवाईची भीतीबरोबर कोरोना रोखण्याची आमचीही जबाबदारी म्हणून अनेकांनी दोनच प्रवासी नेण्यास प्राधान्य दिला, पण त्याच वेळी दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नाही. घर कसे चालवायचे, कुटुंब कसे सांभाळायचे? असा सवाल उपस्थित करीत काहींनी दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली.

अंशत: लाॅकडाऊनदरम्यान रिक्षांमधून दोनच प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे. दोनपेक्षा अधिक प्रवासी आणि मास्क नसेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सक्त सूचना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केल्या. रिक्षाचालकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. रिक्षाचालकांनी, प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना आहेत. त्यानुसार गुरुवारी रिक्षाचालक आणि मास्कचा वापरत करताना दिसून आले. जालना रोड, रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात काही रिक्षाचालक दोनच प्रवाशांना घेऊन जात होते. त्यासाठी भाडे अधिक आकारले जात होते. काहींनी मात्र, कमी भाडे घेत अधिक प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली होती.

रिक्षाचालक म्हणाले...रिक्षाचालक गणेश ठोले म्हणाले, दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधनाचा खर्चही निघत नाही. आधीच प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. किमान तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली पाहिजे. आधीच्या लाॅकडाऊनच्या परिणामातून आता कुठे सावरत होतो. मात्र, आता पुन्हा नव्या लाॅकडाऊनमुळे दोन प्रवाशांची वाहतूक करण्याची सूचना आहे. याचाही फटका सहन करावा लागत असल्याचे काही रिक्षाचालकांनी म्हटले.

दोन दिवस सूचना, नंतर कारवाईपहिलाच दिवस असल्याने कारवाईऐवजी रिक्षाचालकांना दोनच प्रवासी वाहतूक करण्यासंदर्भात सूचना करण्यास प्राधान्य दिला. दोन दिवसांनंतर अधिक प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण रिक्षा- ३५,७८२शहरात धावणाऱ्या- ३०,०००रिक्षाचालकांची संख्या- ४५,०००

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या