शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

किमान तीन प्रवासी हवे; दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नसल्याची ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 14:48 IST

Partial Lockdown in Aurangabad दोनपेक्षा अधिक प्रवासी आणि मास्क नसेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सक्त सूचना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केल्या.

ठळक मुद्देदोनच प्रवासी नेणारे रिक्षाचालक : शहराची आम्हालाही काळजी जास्त प्रवासी नेणारे रिक्षाचालक : कुटुंबाला कसे सांभाळायचे ?

औरंगाबाद : अंशत: लाॅकडाऊन पहिल्याच दिवशी गुरुवारी जालना रोडवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षांचे प्रमाण काहीसे कमी राहिले. कारवाईची भीतीबरोबर कोरोना रोखण्याची आमचीही जबाबदारी म्हणून अनेकांनी दोनच प्रवासी नेण्यास प्राधान्य दिला, पण त्याच वेळी दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नाही. घर कसे चालवायचे, कुटुंब कसे सांभाळायचे? असा सवाल उपस्थित करीत काहींनी दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली.

अंशत: लाॅकडाऊनदरम्यान रिक्षांमधून दोनच प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे. दोनपेक्षा अधिक प्रवासी आणि मास्क नसेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सक्त सूचना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केल्या. रिक्षाचालकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. रिक्षाचालकांनी, प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना आहेत. त्यानुसार गुरुवारी रिक्षाचालक आणि मास्कचा वापरत करताना दिसून आले. जालना रोड, रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात काही रिक्षाचालक दोनच प्रवाशांना घेऊन जात होते. त्यासाठी भाडे अधिक आकारले जात होते. काहींनी मात्र, कमी भाडे घेत अधिक प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली होती.

रिक्षाचालक म्हणाले...रिक्षाचालक गणेश ठोले म्हणाले, दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधनाचा खर्चही निघत नाही. आधीच प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. किमान तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली पाहिजे. आधीच्या लाॅकडाऊनच्या परिणामातून आता कुठे सावरत होतो. मात्र, आता पुन्हा नव्या लाॅकडाऊनमुळे दोन प्रवाशांची वाहतूक करण्याची सूचना आहे. याचाही फटका सहन करावा लागत असल्याचे काही रिक्षाचालकांनी म्हटले.

दोन दिवस सूचना, नंतर कारवाईपहिलाच दिवस असल्याने कारवाईऐवजी रिक्षाचालकांना दोनच प्रवासी वाहतूक करण्यासंदर्भात सूचना करण्यास प्राधान्य दिला. दोन दिवसांनंतर अधिक प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांवर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण रिक्षा- ३५,७८२शहरात धावणाऱ्या- ३०,०००रिक्षाचालकांची संख्या- ४५,०००

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या