शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

अंशत: लॉकडाऊन : जाणून घ्या ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात काय सुरु काय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 1:46 PM

Partial Lockdown in Aurangabad : या काळात रुग्णवाढ झाली तर १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा पर्याय प्रशासनसमोर असेल.

ठळक मुद्देमंगल कार्यालये, सभागृहे, लॉन्स राहणार बंदशहरातील जाधवमंडी बुधवारपासून बंद 

औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन असल्याचे रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या काळात लॉकडाऊन असणार आहे.

जिल्हा टास्क फोर्सची बैठक रविवारी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनासंदर्भात १५ फेब्रुवारीपासूनच्या स्थितीचा आढावा घेतला. औरंगाबादसारख्या शहरातील कोरोना संसर्ग, उपचार, हॉस्पिटल, सेवा-सुविधांवर चर्चा झाली. आरोग्य विभागातील सर्व तज्ज्ञांसोबत चर्चा केली.

३ हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात आहेत. दोन दिवसांपासून ४०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्योग संघटना, व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर १०० टक्के लॉकडाऊन करण्यापेक्षा अंशत: लॉकडाऊन करण्यावर एकमत झाले आहे. ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊनची सुरुवात होणार आहे. साधारणत: ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल. या काळात रुग्णवाढ झाली तर १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा पर्याय प्रशासनसमोर असेल.

शहरात ११ मार्चपासून कोणत्याही राजकीय, धार्मिक सभा होणार नाहीत. सर्व राजकीय आंदोलने, धरणे, मोर्चांवर बंदी असेल. शहरातील सर्व आठवडी बाजार बंद असतील. सर्व जलतरण तलाव बंद असतील. क्रीडा स्पर्धा घेता येणार नाहीत. सरावासाठी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळल्यास परवानगी असेल.

शहरातील महाविद्यालये, विद्यापीठ, शाळा, कोचिंग क्लास बंद राहतील. या सर्वांना ऑनलाइन अध्यापनाची परवानगी आहे. राष्ट्रीय, राज्य पातळीवर भरतीच्या परीक्षा ज्यांचे हॉलतिकीट देण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून याबाबत निर्णय होईल.

शहरातील सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्सवर बुक असलेले सर्व विवाह समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणी पद्धतीने विवाह पद्धत सुरू राहील. हॉटेल्स, परमीट रूम, खाद्य दुकाने व इतर दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. ९ नंतर एकूण क्षमतेच्या ५० टक्केच सुरू राहतील. होम डिलिव्हरी ११ वाजेपर्यंत सुरू राहील. ग्रंथालय, लायब्ररी ५० टक्के क्षमतेत सुरू राहील.

शनिवार, रविवार १०० टक्के लॉकडाऊन असेलया दिवशी वैद्यकीय सेवा, वृत्तपत्रे, दूध, भाजीपाला, जीवनाश्यक दुकाने, उद्योग, कारखाने, बांधकामे, सर्व वाहतूक सेवा सुरू राहतील. आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांची दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्याचे प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असले पाहिजे. मॉल्स बंद राहतील. मांसविक्री, गॅरेज, बँका सुरू राहतील. या काळात दुकाने, बाजारपेठा, मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद राहतील. हॉटेल्समध्ये बसून जेवण मिळणार नाही. होम डिलिव्हरी सुरू राहील. सर्व खाजगी कार्यालये, सरकारी कार्यालये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू राहतील. रिक्षांनी प्रवासी मर्यादा पाळली पाहिजे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद