शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

स्वार्थासाठी समांतरचे नाव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:14 IST

शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देशिवसेना : महापौरांना जिल्हाप्रमुखांकडून घरचा आहेर

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला समांतर जलवाहिनी योजना राबविण्यासाठी दहा वर्षांपूर्वी १६१ कोटी २० लाख रुपये दिले. व्याजापोटी १२७ कोटी ९ लाख रुपये जमा झाले आहेत. मनपाच्या तिजोरीत २८८ कोटी रुपये पडून आहेत. तरीही जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत एक थेंबही पाणी युतीच्या पदाधिकाऱ्यांना आणता आले नाही. उलट मंगळवारी अचानक योजनेचे नाव बदलण्याचा पराक्रम करण्यात आला. यासंदर्भात सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी नमूद केले की, अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले. आता नवीन गंगा-गोदावरी पेयजल योजना असे नाव देण्यात आले. औरंगाबादचा आणि गंगेचा काय संबंध आहे. गंगा पवित्र मानण्यात येते. त्याला कशासाठी बदनाम करताय? स्वार्थासाठी नाव बदलण्याचा हा सर्व खटाटोप आहे.सेनेसोबत नाव जोडल्या गेले...समांतर योजनेचे नाव सेनेसोबत जोडल्या गेले आहे. या योजनेमुळे शिवसेना प्रचंड बदनाम झाली आहे. त्यांना हे नावच नको आहे. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला आहे. नाव बदलले तर सर्व काही धुतल्या जाईल, असे सेना नेत्यांना वाटत आहे. हे कदापि शक्य नाही. स्वार्थासाठी हा खटाटोप सुरू आहे. गंगा पवित्र आहे, असे म्हटले जाते. हे पवित्र नाव तरी बदनाम योजनेत घ्यायला नको होते. नाव बदलल्याने सेनेचा हेतू साध्य होणार नाही.इम्तियाज जलील, आमदारनाव काय बदलता, पाणी द्या...मागील एक दशकापासून शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. त्यांची तहान भागविणे युतीचे आद्य कर्तव्य आहे. जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनीही युतीला टाकता आली नाही. ४ महिन्यांपासून समांतरचा ठराव मंजूर करून ठेवला आहे. पुढे निर्णयच होत नाही. नाव बदलण्यापेक्षा सर्वसामान्यांची तहान भागवावी.भाऊसाहेब जगताप, गटनेता काँग्रेसजनता तहानलेली असताना...शहरातील जनता तहानलेली असताना समांतर जलवाहिनीचे नाव बदलण्यात आले. नाव काहीही ठेवा, पण नागरिकांना पाणी तर द्या. आजच्या परिस्थितीत योजना पूर्ण होणे खूप गरजेचे आहे. दहा वर्षांपासून योजना पूर्ण होत नाही. मागील वर्षभरात पदाधिकाºयांनी नाव का बदलले नाही. आताच हा आविष्कार का झाला. योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक