शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

स्वार्थासाठी समांतरचे नाव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:14 IST

शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देशिवसेना : महापौरांना जिल्हाप्रमुखांकडून घरचा आहेर

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला समांतर जलवाहिनी योजना राबविण्यासाठी दहा वर्षांपूर्वी १६१ कोटी २० लाख रुपये दिले. व्याजापोटी १२७ कोटी ९ लाख रुपये जमा झाले आहेत. मनपाच्या तिजोरीत २८८ कोटी रुपये पडून आहेत. तरीही जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत एक थेंबही पाणी युतीच्या पदाधिकाऱ्यांना आणता आले नाही. उलट मंगळवारी अचानक योजनेचे नाव बदलण्याचा पराक्रम करण्यात आला. यासंदर्भात सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी नमूद केले की, अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले. आता नवीन गंगा-गोदावरी पेयजल योजना असे नाव देण्यात आले. औरंगाबादचा आणि गंगेचा काय संबंध आहे. गंगा पवित्र मानण्यात येते. त्याला कशासाठी बदनाम करताय? स्वार्थासाठी नाव बदलण्याचा हा सर्व खटाटोप आहे.सेनेसोबत नाव जोडल्या गेले...समांतर योजनेचे नाव सेनेसोबत जोडल्या गेले आहे. या योजनेमुळे शिवसेना प्रचंड बदनाम झाली आहे. त्यांना हे नावच नको आहे. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला आहे. नाव बदलले तर सर्व काही धुतल्या जाईल, असे सेना नेत्यांना वाटत आहे. हे कदापि शक्य नाही. स्वार्थासाठी हा खटाटोप सुरू आहे. गंगा पवित्र आहे, असे म्हटले जाते. हे पवित्र नाव तरी बदनाम योजनेत घ्यायला नको होते. नाव बदलल्याने सेनेचा हेतू साध्य होणार नाही.इम्तियाज जलील, आमदारनाव काय बदलता, पाणी द्या...मागील एक दशकापासून शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. त्यांची तहान भागविणे युतीचे आद्य कर्तव्य आहे. जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनीही युतीला टाकता आली नाही. ४ महिन्यांपासून समांतरचा ठराव मंजूर करून ठेवला आहे. पुढे निर्णयच होत नाही. नाव बदलण्यापेक्षा सर्वसामान्यांची तहान भागवावी.भाऊसाहेब जगताप, गटनेता काँग्रेसजनता तहानलेली असताना...शहरातील जनता तहानलेली असताना समांतर जलवाहिनीचे नाव बदलण्यात आले. नाव काहीही ठेवा, पण नागरिकांना पाणी तर द्या. आजच्या परिस्थितीत योजना पूर्ण होणे खूप गरजेचे आहे. दहा वर्षांपासून योजना पूर्ण होत नाही. मागील वर्षभरात पदाधिकाºयांनी नाव का बदलले नाही. आताच हा आविष्कार का झाला. योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक