शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थासाठी समांतरचे नाव बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:14 IST

शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देशिवसेना : महापौरांना जिल्हाप्रमुखांकडून घरचा आहेर

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला समांतर जलवाहिनी योजना राबविण्यासाठी दहा वर्षांपूर्वी १६१ कोटी २० लाख रुपये दिले. व्याजापोटी १२७ कोटी ९ लाख रुपये जमा झाले आहेत. मनपाच्या तिजोरीत २८८ कोटी रुपये पडून आहेत. तरीही जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत एक थेंबही पाणी युतीच्या पदाधिकाऱ्यांना आणता आले नाही. उलट मंगळवारी अचानक योजनेचे नाव बदलण्याचा पराक्रम करण्यात आला. यासंदर्भात सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी नमूद केले की, अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले. आता नवीन गंगा-गोदावरी पेयजल योजना असे नाव देण्यात आले. औरंगाबादचा आणि गंगेचा काय संबंध आहे. गंगा पवित्र मानण्यात येते. त्याला कशासाठी बदनाम करताय? स्वार्थासाठी नाव बदलण्याचा हा सर्व खटाटोप आहे.सेनेसोबत नाव जोडल्या गेले...समांतर योजनेचे नाव सेनेसोबत जोडल्या गेले आहे. या योजनेमुळे शिवसेना प्रचंड बदनाम झाली आहे. त्यांना हे नावच नको आहे. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला आहे. नाव बदलले तर सर्व काही धुतल्या जाईल, असे सेना नेत्यांना वाटत आहे. हे कदापि शक्य नाही. स्वार्थासाठी हा खटाटोप सुरू आहे. गंगा पवित्र आहे, असे म्हटले जाते. हे पवित्र नाव तरी बदनाम योजनेत घ्यायला नको होते. नाव बदलल्याने सेनेचा हेतू साध्य होणार नाही.इम्तियाज जलील, आमदारनाव काय बदलता, पाणी द्या...मागील एक दशकापासून शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. त्यांची तहान भागविणे युतीचे आद्य कर्तव्य आहे. जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनीही युतीला टाकता आली नाही. ४ महिन्यांपासून समांतरचा ठराव मंजूर करून ठेवला आहे. पुढे निर्णयच होत नाही. नाव बदलण्यापेक्षा सर्वसामान्यांची तहान भागवावी.भाऊसाहेब जगताप, गटनेता काँग्रेसजनता तहानलेली असताना...शहरातील जनता तहानलेली असताना समांतर जलवाहिनीचे नाव बदलण्यात आले. नाव काहीही ठेवा, पण नागरिकांना पाणी तर द्या. आजच्या परिस्थितीत योजना पूर्ण होणे खूप गरजेचे आहे. दहा वर्षांपासून योजना पूर्ण होत नाही. मागील वर्षभरात पदाधिकाºयांनी नाव का बदलले नाही. आताच हा आविष्कार का झाला. योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक