शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

नुकसानीचे काही ठिकाणीच पंचनामे; प्रतीक्षा सर्वत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 17:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार काही ठिकाणी पंचनामे

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा शेतीला तडाखा सुस्तावलेले प्रशासन जागे कधी होणार

औरंगाबाद : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबत शासनाकडून अद्यापही अध्यादेश जारी झालेला नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी सूचनेनुसार आता  सिल्लोड, सोयगाव हे दोन तालुके सोडले, तर कन्नड, खुलताबाद, गंगापूर व फुलंब्री या  तालुक्यांमध्ये पंचनाम्याला अद्यापही सुरुवात झालेली नाही. 

अगोदरच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर परतीच्या पावसाचे चटके सहन करीत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसनवारी, कर्ज घेऊन कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी खरिपाची पिके जगविली. मात्र, ऐन काढणी सुरू असतानाच बघता बघता हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून नेला. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील पिकांची अक्षरश: माती झाली. 

प्रामुख्याने सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, फुुलंब्री या चार तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तब्बल पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काढणी   करून ठेवलेली मका, बाजरीची कणसे पाण्यावर तरंगू लागली आहेत. अनेक ठिकाणी मका व बाजरीच्या कणसाला कोंब फुटले. पावसाची तीव्रता एवढी होती की, शेताला तळ्याचे स्वरूप आले. काही ठिकाणी कपाशीच्या बोंडातून कोंब बाहेर निघाले आहेत. सोयाबीन, ज्वारी, कापूस आडवे झाले आहेत. साधारणपणे १८ आॅक्टोबरपासून काही मंडळांमध्ये संततधार, तर काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. डोळ्यासमोर पिकांचे झालेले नुकसान पाहून दोन हतबल शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा दिवाळीच्या दिवसांतच शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने दिवाळे काढले. 

निवडणूक संपल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे केले जातील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु शासनाकडून नुकसानभरपाईसंबंधी अजूनही पावले उचलली नाहीत.  आता जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार प्रशासनाकडून पंचनाम्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्येही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे व ज्यांनी काढलेला नाही, अशी वर्गवारी करून पंचनामे केले जात आहेत. पंचनाम्यासाठी संयुक्त पथके तैनात करण्यात आली असून, त्यामध्ये कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. यामध्ये काही ठिकाणी विमा कंपनीचे प्रतिनिधीदेखील सहभागी आहेत. असे असले तरी अजूनही सिल्लोड, सोयगाव हे दोन तालुके सोडले, तर अन्य तालुक्यांमध्ये पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही.

अहवाल सादरसिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे ८१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. कन्नड तालुक्यात ८८ हजार ८९९ हेक्टरपैकी ७३ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. फुलंब्री तालुक्यात २२ हजार हेक्टरपैकी १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका वाया गेला. सोयगाव तालुक्यात ४१ हजार १५० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी