शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नुकसानीचे काही ठिकाणीच पंचनामे; प्रतीक्षा सर्वत्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 17:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार काही ठिकाणी पंचनामे

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा शेतीला तडाखा सुस्तावलेले प्रशासन जागे कधी होणार

औरंगाबाद : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबत शासनाकडून अद्यापही अध्यादेश जारी झालेला नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी सूचनेनुसार आता  सिल्लोड, सोयगाव हे दोन तालुके सोडले, तर कन्नड, खुलताबाद, गंगापूर व फुलंब्री या  तालुक्यांमध्ये पंचनाम्याला अद्यापही सुरुवात झालेली नाही. 

अगोदरच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर परतीच्या पावसाचे चटके सहन करीत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसनवारी, कर्ज घेऊन कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी खरिपाची पिके जगविली. मात्र, ऐन काढणी सुरू असतानाच बघता बघता हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून नेला. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील पिकांची अक्षरश: माती झाली. 

प्रामुख्याने सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, फुुलंब्री या चार तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तब्बल पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काढणी   करून ठेवलेली मका, बाजरीची कणसे पाण्यावर तरंगू लागली आहेत. अनेक ठिकाणी मका व बाजरीच्या कणसाला कोंब फुटले. पावसाची तीव्रता एवढी होती की, शेताला तळ्याचे स्वरूप आले. काही ठिकाणी कपाशीच्या बोंडातून कोंब बाहेर निघाले आहेत. सोयाबीन, ज्वारी, कापूस आडवे झाले आहेत. साधारणपणे १८ आॅक्टोबरपासून काही मंडळांमध्ये संततधार, तर काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. डोळ्यासमोर पिकांचे झालेले नुकसान पाहून दोन हतबल शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा दिवाळीच्या दिवसांतच शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने दिवाळे काढले. 

निवडणूक संपल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे केले जातील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु शासनाकडून नुकसानभरपाईसंबंधी अजूनही पावले उचलली नाहीत.  आता जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार प्रशासनाकडून पंचनाम्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्येही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे व ज्यांनी काढलेला नाही, अशी वर्गवारी करून पंचनामे केले जात आहेत. पंचनाम्यासाठी संयुक्त पथके तैनात करण्यात आली असून, त्यामध्ये कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. यामध्ये काही ठिकाणी विमा कंपनीचे प्रतिनिधीदेखील सहभागी आहेत. असे असले तरी अजूनही सिल्लोड, सोयगाव हे दोन तालुके सोडले, तर अन्य तालुक्यांमध्ये पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही.

अहवाल सादरसिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे ८१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. कन्नड तालुक्यात ८८ हजार ८९९ हेक्टरपैकी ७३ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. फुलंब्री तालुक्यात २२ हजार हेक्टरपैकी १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका वाया गेला. सोयगाव तालुक्यात ४१ हजार १५० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी