शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पीक नुकसानीचे ९० % पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:08 IST

सुमारे ७ हजार गावांतील नुकसानीचे अहवाल तयार

ठळक मुद्दे८ हजार ४७९ गावे बाधित 

औरंगाबाद : मराठवाड्यात आॅक्टोबरमध्ये पडलेल्या पावसामुळे झालेल्या शेती आणि पिकांच्या नुकसानीचे जवळपास ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ८ हजार ४७९ गावांतील पिकांचे नुकसान झाले असून, आजपर्यंत सुमारे ७ हजार गावांतील पीक नुकसानीचे अहवाल तयार झाले आहेत. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन एकूण नुकसान किती झाले आहे, याचा प्रशासकीय आकडा समोर येईल.  

९ लाख ६१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाले आहे. ३० लाख शेतकऱ्यांचे पंचनामे आजवर पूर्ण झाले आहेत. ३४ लाख १४ हजार ६६१ एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. एकूण ३१ लाख ७२ हजार ४९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १३५५ पैकी सुमारे १ हजार गावांतील पंचनामे पूर्ण झाले असून, ४ लाख ५२ हजार ९४८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण ४ लाख ८ हजार २७६ हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. जालन्यातील ९६४ पैकी ८१० गावांतील ५ लाख १० हजार ६५८ पैकी ४ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. परभणीतील ८४३ गावांतील पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. हिंगोलीतील ७०७ पैकी ६०० गावांतील २ लाख ४५ हजार ९१० पैकी दीड लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील १५२५ पैकी १४०० गावांतील ५ लाख ८६ हजार २९९ पैकी ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्यातील १४०२ पैकी १२०० गावांतील ५ लाख ६७ हजारपैकी साडेचार लाख शेतकऱ्यांचे पंचनामे आजवर झाले आहेत. लातूरमधील ९५१ पैकी ३६० गावांतील ३ लाख ७३ हजार ६६६ पैकी अडीच लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर उस्मानाबादमधील ७३२ पैकी ६०० गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. ३ लाख ३९ हजार ४१८ पैकी अडीच लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 

पंचनाम्यानंतर समोर येईल आर्थिक नुकसानमराठवाड्यातील सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकूण पेरणी, उत्पादकता आणि उत्पादन यावरून किती नुकसान झाले, याचा अंदाजे अहवाल तयार करण्यात येईल, असे विभागीय महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांंगितले. ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा दावाही सोमण यांनी केला. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊसMarathwadaमराठवाडा