शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पाकला झुकवले, भूमाफियांनी हरवले; १७ वर्षानंतर औरंगाबादमध्ये परतलेल्या महिलेचा प्लॉट हडप

By सुमेध उघडे | Updated: February 4, 2021 17:42 IST

पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तानच्या जेलमध्ये तब्बल १७ वर्षे राहिलेल्या हसीनाबीबी ऊर्फ सहजाली ऊर्फ हसीना शेख अब्दुल करीम (वय ५०, रा. रशीदपुरा) यांना सिटीचौक पोलिसांच्या अहवालानंतर नुकतेच मायदेशी परतता आले.

ठळक मुद्दे २६ जानेवारी (प्रजासत्ताकदिनी) रोजी त्या रेल्वेने औरंगाबादेतील बहिणीच्या घरी पोहोचल्या.. हसीना बेगम यांनी १८ जुलै २००० साली शहरातील रशिद्पुरा येथे एक प्लॉट विकत घेतला होता. यानंतर हसीना बेगम यांनी आपल्या प्लॉटचा शोध घेतला असता त्या जागी अन्य कोणी राहत असल्याचे दिसून आले.

औरंगाबाद : शहरातील एका प्लॉटच्या कागदपत्रांवरून पाकिस्तानच्या जेलमधून तब्बल १७ वर्षानंतर हसीना बेगम भारतात परतल्या. मात्र, शहरात परतल्यानंतर ज्या प्लॉटच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची सुटका झाली तोच प्लॉट भूमाफियांनी बळकावला असल्याचे उघडकीस आले आहे. आपला प्लॉट परत मिळावा यासाठी हसीना बेगम पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. 

पासपोर्ट हरवल्यामुळे पाकिस्तानच्या जेलमध्ये तब्बल १७ वर्षे राहिलेल्या हसीनाबीबी ऊर्फ सहजाली ऊर्फ हसीना शेख अब्दुल करीम (वय ५०, रा. रशीदपुरा) यांना सिटीचौक पोलिसांच्या अहवालानंतर नुकतेच मायदेशी परतता आले. २६ जानेवारी (प्रजासत्ताकदिनी) रोजी त्या रेल्वेने औरंगाबादेतील बहिणीच्या घरी पोहोचल्या. हसीना बेगम यांनी १८ जुलै २००० साली शहरातील रशिद्पुरा येथे एक प्लॉट विकत घेतला होता. याची रजिस्ट्री करण्यात आली होती. यानंतर त्यांचे लग्न झाले आणि त्या उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथील शेख दिलशाद अहमद यांच्यासोबत झाले. त्यांना मूलबाळ नाही. २००४ साली त्या नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने पाकिस्तानला गेल्या होत्या. तेव्हा तेथे त्यांच्या नातेवाइकांची भेट झाली नाही. मात्र, त्यांचा पासपोर्ट हरवला. तेव्हा संशयित म्हणून त्यांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जेलमध्ये टाकले. तेव्हापासून त्या मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. 

२०१९ साली भारत सरकारला तिची माहिती मिळाली आणि तिला परत आणण्याची कार्यवाही सुरू झाली. ती औरंगाबादची असल्याचे सांगत होती. यामुळे औरंगाबाद पोलिसांना तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यास सांगण्यात आले. केवळ चेलीपुरा, औरंगाबाद, असा तिचा पत्ता होता. हा भाग सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. यामुळे सिटीचौक पोलिसांना कामाला लावण्यात आले. हवालदार अजीम इनामदार यांनी तिचे नातेवाईक, तसेच तिच्या नावे असलेली स्थानिक संपत्तीची कागदपत्रे मिळविले आणि ती औरंगाबादची असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले. शिवाय तिच्या बहिणीची मुलगा खाजा जहिरोद्दीन चिश्ती यांचा शोध घेतला. कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यावर २१ डिसेंबर रोजी पाकिस्तानमधून अमृतसर (पंजाब) येथे आली. तेव्हापासून ती रेडक्रॉस सोसायटीच्या ताब्यात होती. तिला घेऊन जाण्याचे निर्देश पोलिसांना प्राप्त झाल्यावर पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेबूब महेमूद शेख, महिला पोलीस रइसा जमिरोद्दीन शेख यांनी अमृतसर येथे जाऊन हसीनाबीबी यांना २६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता रेल्वेने औरंगाबादला आणले.  

यानंतर हसीना बेगम यांनी आपल्या प्लॉटचा शोध घेतला असता त्या जागी अन्य कोणी राहत असल्याचे दिसून आले. ज्या कागदपत्राच्या आधारे त्या भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध झाले होते तो प्लॉटचा ताब्यात नसल्याने त्यांना धक्का बसला. या प्रकरणी त्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. सध्या त्या बहिणीची मुलगा खाजा जहिरोद्दीन चिश्ती याच्या सोबत एका किरायाच्या घरात राहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी