शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रात्रभर ठिय्या आंदोलन; शेकोटीच्या साथीने एकीचा निर्धार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:11 IST

सोलापुर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अंबाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपदरचा खर्च करुन शेतकऱ्यांनी नासाडी झालेल्या कालव्याची दुरुस्ती केली.नियमानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना पाण्याची दोन आवर्तने मिळायला पाहिजे होती

कन्नड - अंबाडी धरणाचे पाणी शेती सिंचनासाठी तात्काळ सोडावे या मागणीसाठी धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात गुरुवारी दुपारपासुन ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत कालव्याच्या शेवटच्या टोकाच्या लाभार्थ्याला पाणी जाणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. थंडी असल्याने शेकोटीही पेटविण्यात आली होती.

सोलापुर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अंबाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी पाणी मिळेल व पेरणी केलेली पिके वाचतील या आशेपोटी पदरचा खर्च करुन शेतकऱ्यांनी नासाडी झालेल्या कालव्याची दुरुस्ती केली. वारंवार पाठलाग करूनही पाणी मिळत नसल्याने ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचे आंदोलकांनी सांगितले. कालव्याच्या कामासाठी आलेले शासकीय पोकलेन पंधरा दिवसांपासून  डिझेल नसल्याने उभे आहे. नियमानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना पाण्याची दोन आवर्तने मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाहीत. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपु लागली आहेत. पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले आहेत. मात्र, पाणी सोडण्यात आले नाही असे सचिन पवार यांनी सांगीतले. आंदोलनात जगदीश जाधव,अशोक मुठ्ठे,सुशिल मोरे,कैलास ज़ाधव,दिनेश जाधव,श्रीहरी दापके,प्रविण जाधव,कडूबा जित्ते,दामु जाधव,बाळू जाधव,रमेश सिरसाट,प्रल्हाद सिरसाट,शिवनाथ दापके,बाळू गपक,बाळू शिंदे,आप्पासाहेब साबळे,संदीप वाघ यांच्यासह लाभक्षेत्रातील शिवराई,बहिरगाव,भोकनगाव,डोनगाव,विठ्ठलपुर येथील शेतकरी सहभागी आहेत.      पाणी सोडले; मातीकामामुळे येण्यास वेळ लागले पाणी सोडलेले आहे पण नविन मातीकाम असल्याने पाण्याचा जिरण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी जाण्यास वेळ लागत आहे.जास्त दाबाने पाणी सोडल्यास कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नुकसान झालेल्या कालव्याचे अंदाजपत्रक पाठविण्यात आलेले आहे असे शाखा अभियंता जारवाल यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणीagitationआंदोलन