शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रात्रभर ठिय्या आंदोलन; शेकोटीच्या साथीने एकीचा निर्धार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:11 IST

सोलापुर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अंबाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपदरचा खर्च करुन शेतकऱ्यांनी नासाडी झालेल्या कालव्याची दुरुस्ती केली.नियमानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना पाण्याची दोन आवर्तने मिळायला पाहिजे होती

कन्नड - अंबाडी धरणाचे पाणी शेती सिंचनासाठी तात्काळ सोडावे या मागणीसाठी धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयात गुरुवारी दुपारपासुन ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत कालव्याच्या शेवटच्या टोकाच्या लाभार्थ्याला पाणी जाणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. थंडी असल्याने शेकोटीही पेटविण्यात आली होती.

सोलापुर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अंबाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी पाणी मिळेल व पेरणी केलेली पिके वाचतील या आशेपोटी पदरचा खर्च करुन शेतकऱ्यांनी नासाडी झालेल्या कालव्याची दुरुस्ती केली. वारंवार पाठलाग करूनही पाणी मिळत नसल्याने ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचे आंदोलकांनी सांगितले. कालव्याच्या कामासाठी आलेले शासकीय पोकलेन पंधरा दिवसांपासून  डिझेल नसल्याने उभे आहे. नियमानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांना पाण्याची दोन आवर्तने मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाहीत. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपु लागली आहेत. पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले आहेत. मात्र, पाणी सोडण्यात आले नाही असे सचिन पवार यांनी सांगीतले. आंदोलनात जगदीश जाधव,अशोक मुठ्ठे,सुशिल मोरे,कैलास ज़ाधव,दिनेश जाधव,श्रीहरी दापके,प्रविण जाधव,कडूबा जित्ते,दामु जाधव,बाळू जाधव,रमेश सिरसाट,प्रल्हाद सिरसाट,शिवनाथ दापके,बाळू गपक,बाळू शिंदे,आप्पासाहेब साबळे,संदीप वाघ यांच्यासह लाभक्षेत्रातील शिवराई,बहिरगाव,भोकनगाव,डोनगाव,विठ्ठलपुर येथील शेतकरी सहभागी आहेत.      पाणी सोडले; मातीकामामुळे येण्यास वेळ लागले पाणी सोडलेले आहे पण नविन मातीकाम असल्याने पाण्याचा जिरण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी जाण्यास वेळ लागत आहे.जास्त दाबाने पाणी सोडल्यास कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नुकसान झालेल्या कालव्याचे अंदाजपत्रक पाठविण्यात आलेले आहे असे शाखा अभियंता जारवाल यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणीagitationआंदोलन