शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

एक वर्षांपासून औट्रम घाट बंद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:50 IST

औट्रम घाटातील बोगद्याच्या कामासाठी संघर्ष समितीचे साखळी उपोषण

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळेवरील कन्नडनजीकच्या औट्रम घाट जडवाहतुकीसाठी बंद करण्याच्या कोर्टाच्या आदेशाला एक वर्ष झाले आहे. घाट जड वाहतुकीस बंद असल्यामुळे जिल्ह्यासह कन्नड तालुक्यातील अर्थकारणाला ब्रेक लागला असून, औट्रम घाटातील १४ वर्षांपासून रखडलेले बोगद्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू करावे. या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग ५२ व छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नियोजित रेल्वेमार्ग संघर्ष समितीने विभागीय आयुक्तालयावर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

माजी जि. प. अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात अशोक दाबके, सदाशिव पाटील, जगन्नाथ खोसरे, अशोक कुमावत, अंकुश जाधव, परसराम घुगे, अब्दुल वहाब, बंटी सातदिवे, प्रकाश काचोळे, आर. एस. पवार आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, औट्रम घाटातील १४ कि.मी.चा बोगदा वगळता महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक जाम होत असल्यामुळे घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. कसाबखेडा फाट्यावरून शिऊर बंगला ते येवला-नांदगावमार्गे वाहतूक सध्या सुरू आहे. १२० कि.मी.चा हा फेरा मारून चाळीसगावमार्गे धुळे हायवेला जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तोटा आहे. बोगद्याच्या कामासाठी डीपीआर बनिवणे, दगडाच्या चाचण्या घेणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे. ही सगळी प्रक्रिया गेल्या दशकात झाली. तीन हजार कोटींमध्ये बोगद्याचे काम होणार होते. परंतु त्यावर केंद्र शासनाने निर्णय घेतला नाही. आता बोगद्याचे काम सहा हजार कोटींहून अधिक खर्चापर्यंत गेले आहे. त्यातच केंद्र शासनाने बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. पर्यायी मार्गाचा विचार करण्याच्या सूचना शासनाने केल्या. त्यावरही अद्याप काहीही निर्णय झाला नाही. दरम्यान, माजी खा. चंद्रकांत खैरे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतील. उपोषणकर्त्यांची मागणी एनएचएआयच्या मुख्यालयास पाठविण्यात येईल, असे नमूद केले.

उद्योगांसह सर्व अर्थकारणाला फटका...पेट्रोलपंप, हॉटेलचालक, शेतकरी, व्यापारी, उद्योगांना घाट बंद असल्यामुळे फटका बसला आहे. त्यामुळे बोगद्याचे काम सुरू करावे. कन्नड-वैजापूर व अंधानेर, कोळवाडी, जेहूर या मार्गावर उड्डाणपूल बांधावा, भांबरवाडी ते कसाबखेड्यापर्यंत सर्व्हिसरोड बांधावा. महामार्गालगत ऑक्सिजन निर्मिती करणारे वृक्ष लावावेत. अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग