शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षांपासून औट्रम घाट बंद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:50 IST

औट्रम घाटातील बोगद्याच्या कामासाठी संघर्ष समितीचे साखळी उपोषण

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळेवरील कन्नडनजीकच्या औट्रम घाट जडवाहतुकीसाठी बंद करण्याच्या कोर्टाच्या आदेशाला एक वर्ष झाले आहे. घाट जड वाहतुकीस बंद असल्यामुळे जिल्ह्यासह कन्नड तालुक्यातील अर्थकारणाला ब्रेक लागला असून, औट्रम घाटातील १४ वर्षांपासून रखडलेले बोगद्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू करावे. या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग ५२ व छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नियोजित रेल्वेमार्ग संघर्ष समितीने विभागीय आयुक्तालयावर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

माजी जि. प. अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात अशोक दाबके, सदाशिव पाटील, जगन्नाथ खोसरे, अशोक कुमावत, अंकुश जाधव, परसराम घुगे, अब्दुल वहाब, बंटी सातदिवे, प्रकाश काचोळे, आर. एस. पवार आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, औट्रम घाटातील १४ कि.मी.चा बोगदा वगळता महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक जाम होत असल्यामुळे घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. कसाबखेडा फाट्यावरून शिऊर बंगला ते येवला-नांदगावमार्गे वाहतूक सध्या सुरू आहे. १२० कि.मी.चा हा फेरा मारून चाळीसगावमार्गे धुळे हायवेला जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तोटा आहे. बोगद्याच्या कामासाठी डीपीआर बनिवणे, दगडाच्या चाचण्या घेणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे. ही सगळी प्रक्रिया गेल्या दशकात झाली. तीन हजार कोटींमध्ये बोगद्याचे काम होणार होते. परंतु त्यावर केंद्र शासनाने निर्णय घेतला नाही. आता बोगद्याचे काम सहा हजार कोटींहून अधिक खर्चापर्यंत गेले आहे. त्यातच केंद्र शासनाने बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. पर्यायी मार्गाचा विचार करण्याच्या सूचना शासनाने केल्या. त्यावरही अद्याप काहीही निर्णय झाला नाही. दरम्यान, माजी खा. चंद्रकांत खैरे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतील. उपोषणकर्त्यांची मागणी एनएचएआयच्या मुख्यालयास पाठविण्यात येईल, असे नमूद केले.

उद्योगांसह सर्व अर्थकारणाला फटका...पेट्रोलपंप, हॉटेलचालक, शेतकरी, व्यापारी, उद्योगांना घाट बंद असल्यामुळे फटका बसला आहे. त्यामुळे बोगद्याचे काम सुरू करावे. कन्नड-वैजापूर व अंधानेर, कोळवाडी, जेहूर या मार्गावर उड्डाणपूल बांधावा, भांबरवाडी ते कसाबखेड्यापर्यंत सर्व्हिसरोड बांधावा. महामार्गालगत ऑक्सिजन निर्मिती करणारे वृक्ष लावावेत. अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग