शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

'नुकसानग्रस्त लाखांत, तक्रारी केवळ ४ हजार ३३०'; वेळेत तक्रार न केल्याने वंचित राहणार शेतकरी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 12:54 IST

जालना, बीड, औरंगाबाद या ३ जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

ठळक मुद्देअनेक शेतकऱ्यांनी वेळेत तक्रार केली नाही  ७२ तासांत ऑनलाइन तक्रार कराउशिरा तक्रारी विमा कंपन्यांनी नाकारल्या

औरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५२ शेतकऱ्यांनी ३ लाख ५६ हजार ८५७ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला. मात्र, सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसात सुमारे २ लाख ६५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, ४ हजार ३३० शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रारी केल्या. त्यामुळे तक्रारींव्यतिरिक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जालना, बीड, औरंगाबाद या ३ जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहोचली असताना कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारी फक्त २० हजार ७२ आाहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५२ शेतकऱ्यांनी आपल्या ३ लाख ५६ हजार ८५७ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा ३६६ कोटी ८९ लाख ७८ हजार १६० रुपयांचा विमा हप्ता भरला. त्यामुळे १,२५१ कोटी ७३ हजार ७४६ रुपयांचे विमा संरक्षण मिळविले. बाधित शेतकऱ्यांकडून तक्रारी वेळेत होत नसल्याने कंपन्यांकडून नुकसानीचे दावे फेटाळले जातात, तसेच नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेलेल्या अहवालानुसार शासन मदतीचे वाटप सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले.

७२ तासांत ऑनलाइन तक्रार करापीकविम्यासाठी नुकसानीच्या तीन दिवसांत तक्रार कृषी विभाग किंवा विमा कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करावी लागते. तक्रारींचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई विमा कंपनी देते, असे कृषी विभागाचे सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी सांगितले.

उशिरा तक्रारी विमा कंपन्यांनी नाकारल्या१९ ऑक्टोबरपर्यंत केवळ जालना जिल्ह्यातून ऑफलाइन ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८,०१६ तक्रारींपैकी ३,३८१ तक्रारी उशिरा, १,२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी रिजेक्ट केल्या गेल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. विमा कंपन्यांकडून करण्यात आल्याची माहिती डाॅ. जाधव यांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादfundsनिधी