शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आमचा हक्क, आमचं पाणी; मराठवाडा वॉटर ग्रीड योजना दिवास्वप्न तर नव्हे?

By बापू सोळुंके | Updated: March 25, 2023 12:55 IST

सत्तांतरानंतर पुन्हा वॉटरग्रीडची आशा पल्लवित

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रस्तावित मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गत महाविकास आघाडी सरकारने गुंडाळली होती. सत्तांतरानंतर शिंदे, फडणवीस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला पुन्हा मूर्त रूप देण्याच्या हालचाली करीत ही योजना मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अस्तित्वात येणार आहे अथवा ही योजना एक दिवास्वप्न तर नव्हे, अशी चर्चा सुरू झाली आहे. कमी पावसामुळे मराठवाड्यातील धरणे अनेकदा कोरडी पडतात. अशा परिस्थितीत मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अव्यवहार्य असल्याचे आधीच्या सरकारचे मत झाले होते. योजनेच्या यशस्वितेविषयी तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मते आहेत.

मराठवाड्यात कधी भरपूर पाऊस तर कधी दुष्काळ अशीच परिस्थिती राहिली आहे. सध्या सन २०१७ पासून मराठवाड्यावर निसर्ग मेहरबान आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य नाही. मात्र, तत्पूर्वीची वर्ष मराठवाड्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत. मराठवाड्यातील सर्व गावे आणि शहरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. जनावरांसाठी चारा छावण्या उभारून त्यांच्या पाण्याची व्यवस्थाही टँकरच्या पाण्यावर केली जात. तीव्र पाणीटंचाईचा फटका उद्योगांनाही बसला होता. ही बाब लक्षात घेऊन सन २०१९ साली तत्कालीन फडणवीस सरकारने मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा सखोल अभ्यास आणि आराखडा तयार करण्यासाठी शासनाने इस्त्रायलच्या मेकारोट डेव्हल्पमेंट ॲण्ड इंटरप्रायझेस कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या कंपनीने मराठवाड्यात पडणारा पाऊस, लोकसंख्या, पशुधनाचा विचार करून सन २०५० पर्यंत लागणाऱ्या पाण्याची गरज याचा अभ्यास करून मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा प्रकल्प अहवाल शासनास सादर केला होता. या अहवालानंतर फडणवीस सरकारने १८ हजार ८६५ कोटी रुपये खर्चाच्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली. या योजनेमध्ये जलस्रोत ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १ हजार ७९५ किलोमीटर पाइपलाइन टाकणे आणि जलशुद्धीकरण केंद्र ते गावापर्यंत ३ हजार ९९९ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव आहे. २८ जलशुद्धीकरण केंद्र स्थापन केले जातील. अव्यवहार्य योजना असल्याचे मत नोंदवून महाविकास आघाडी सरकारने ही योजना गुंडाळली होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारने ही योजना मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याने मराठवाड्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मराठवाड्यातील जनतेला सन २०५० साली ३४ टीएमसी पाण्याची गरजमराठवाड्यातील ग्रामीण भागात २ कोटी ३५ लाख तर शहरी भागात १ कोटी २१ लाख लोकसंख्या आणि ६९ लाख पशुधन सन २०५० साली असेल. या लोकसंख्येसाठी ३४ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.

काय आहे मराठवाडा वॉटर ग्रीड योजनाकमी पावसाचा प्रदेश असलेल्या मराठवाड्यात सन २०१२ ते १६ या कालावधीत सतत कमी पाऊस पडला. यामुळे येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. लातूर शहराला तर चक्क रेल्वेने कृष्णा खोऱ्यातील मिरज (जि. सोलापूर) येथून पाणीपुरवठा करावा लागला होता. मराठवाड्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मोठ्या धरणापासून भूमिगत पाइपलाइनद्वारे २८ ठिकाणच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणे आणि हे शुद्ध पाणी पाइपलाइनद्वारे सर्व गाव आणि शहरांना देण्याची ही योजना आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत काय म्हणतात तज्ज्ञमराठवाड्यातील उपलब्ध पाण्यावर अवलंबून न ठेवता, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना नाशिक येथील मराठवाड्यातील सिंचनासाठी बांधलेल्या मुकणे, भाम, भावली आणि वाकी या धरणास जोडणे आवश्यक आहे. शिवाय या योजनेचा लाभ कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्प राबवितानाही घेता येईल. जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी संयुक्त समिती नेमून प्रत्येक जिल्ह्यासाठी व्यवस्थित पाणी वाटप होईल, याची काळजी घ्यावी.-डॉ. शंकर नागरे, तज्ज्ञ सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRainपाऊस