शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

...अन्यथा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: August 18, 2023 18:38 IST

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवेंचा शासनाला इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याने पळविले आहे. नांदूर,मधमेश्वरसाठी बांधलेल्या चार धरणातून ३०० द.ल.घ.मी.पाणी बंधनकारक असताना या पाण्यावर पिण्याच्यावर आरक्षण टाकण्यात आले आहे. हक्काचे पाणी मिळावे,अशी मराठवाड्याच्या जनतेची मागणी आहे. यासाठी विरोधीपक्षनेते म्हणून शासनास विनंती करू, ही विनंती मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरू,असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शासनाला दिला.

आ.दानवे यांनी गोदावरी  मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांची शुक्रवारी सिंचन भवन येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावर्षी मुबलक पाऊस न पडल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ३४ टक्के जलसाठा आहे.गतवर्षी आजच्या दिवशी ८७ टक्के जलसाठा होता. अन्य धरणांतही अल्पजलसाठा आहे. यापार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील मंजूर लहान,मोठी आणि मध्यम धरणांची काय परिस्थिती आहे, किती प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत, किती प्रकल्पांची कामे यावर्षी पूर्ण होतील.तसेच दोन्ही जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचे दानवे म्हणाले. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला पाणी देण्याचे प्रस्तावित आहे,याविषयी माहिती घेतली.दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या विविध धरणांत वळविण्यात आले आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे,यासाठी शासनाला विनंती करणार आहे, यानंतरही त्यांनी न ऐकल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.  

नांदूर मधमेश्वरच्या हक्काचे ३०० दलघमी पाण्यावरही डल्ला कायम कमी पावसाची तालुके म्हणून   गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांची ओळख आहे. या तालुक्यांसाठी नांदूर- मधमेश्वर प्रकल्प बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात चार लहान मोठी धरणे बांधलली आहेत. या धरणांची एकूण साठवणक्षमता ३८३ द.ल.घ.मी. आहे. यातील ३०० दलघमी. पाणी नांदूर मधमेश्वर प्रकल्पासाठी राखीव आहे.असे असताना नाशिक शहर, सिन्नर आणि अन्य गावांसाठी पिण्याचे पाणी घेण्यात आल्याने प्रत्यक्षात नांदूर मधमेश्वरला केवळ १२०दलघमी पाणी मिळते. यातही उन्हाळ्यात ५ ते ५० टक्के पाण्याचा वहन तोटा होतो. 

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद