शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शिल्लक राहिलेला ऊस त्वरित तोडण्याचे आदेश द्या; जनहित याचिकेद्वारे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 11:55 IST

खंडपीठाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस, शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश

औरंगाबाद : राज्यात तोडणीवाचून शिल्लक असलेला ४० ते ५० टक्के ऊस त्वरित तोडण्याचा आदेश देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याचिकेतील सर्व मुद्द्यांवर ६ आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने त्यांना दिले. ॲड. देवीदास आर. शेळके यांनी (पार्टी-इन-पर्सन) ही याचिका दाखल केली आहे.

राज्यात आणि मराठवाड्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली असून, ७ महिन्यांचा गळीत हंगाम संपला आहे. केवळ एक महिन्याचा कालावधी उरला आहे. नोंदीचा व बिगर नोंदीचा ४० ते ५० टक्के ऊस तोडणीवाचून शिल्लक आहे. ऊसतोड होत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. उसाच्या उताऱ्यात मोठी घट येत असल्याने शेतकऱ्यांचे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

केंद्र सरकारने नव्या कारखान्यासाठी अस्तित्वात असलेल्या कारखान्यापासून १५ कि.मी.च्या हवाई अंतराची अट घातली आहे. तर राज्य सरकारने २५ किमी हवाई अंतरात नवा कारखाना सुरू करण्यासाठी बंदी घातलेली आहे. मात्र कारखान्यांवर २५ किमी क्षेत्रातील ऊस तोडण्याचे बंधन घातलेले नाही. ही तरतूद घटनाबाह्य असून, ती रद्द करावी. २५ किमीच्या अटीमुळेच जास्त कारखाने उभे राहू शकले नसल्याने शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एकरी ४० टनाप्रमाणे भरपाई द्यावी. शेतकऱ्यांकडून ऊसतोडणी आणि वाहतुकीपोटी जी रक्कम घेण्यात आली, ती त्यांच्या एफआरपीमधून वजा करू नये. उतारा काढण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना सहभागी करून पारदर्शी करण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावेत. तसेच प्रशासनाला बिगर नोंदीच्या उसाची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गSugar factoryसाखर कारखाने