शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

शिल्लक राहिलेला ऊस त्वरित तोडण्याचे आदेश द्या; जनहित याचिकेद्वारे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 11:55 IST

खंडपीठाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस, शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश

औरंगाबाद : राज्यात तोडणीवाचून शिल्लक असलेला ४० ते ५० टक्के ऊस त्वरित तोडण्याचा आदेश देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याचिकेतील सर्व मुद्द्यांवर ६ आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने त्यांना दिले. ॲड. देवीदास आर. शेळके यांनी (पार्टी-इन-पर्सन) ही याचिका दाखल केली आहे.

राज्यात आणि मराठवाड्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली असून, ७ महिन्यांचा गळीत हंगाम संपला आहे. केवळ एक महिन्याचा कालावधी उरला आहे. नोंदीचा व बिगर नोंदीचा ४० ते ५० टक्के ऊस तोडणीवाचून शिल्लक आहे. ऊसतोड होत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. उसाच्या उताऱ्यात मोठी घट येत असल्याने शेतकऱ्यांचे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

केंद्र सरकारने नव्या कारखान्यासाठी अस्तित्वात असलेल्या कारखान्यापासून १५ कि.मी.च्या हवाई अंतराची अट घातली आहे. तर राज्य सरकारने २५ किमी हवाई अंतरात नवा कारखाना सुरू करण्यासाठी बंदी घातलेली आहे. मात्र कारखान्यांवर २५ किमी क्षेत्रातील ऊस तोडण्याचे बंधन घातलेले नाही. ही तरतूद घटनाबाह्य असून, ती रद्द करावी. २५ किमीच्या अटीमुळेच जास्त कारखाने उभे राहू शकले नसल्याने शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एकरी ४० टनाप्रमाणे भरपाई द्यावी. शेतकऱ्यांकडून ऊसतोडणी आणि वाहतुकीपोटी जी रक्कम घेण्यात आली, ती त्यांच्या एफआरपीमधून वजा करू नये. उतारा काढण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना सहभागी करून पारदर्शी करण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावेत. तसेच प्रशासनाला बिगर नोंदीच्या उसाची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गSugar factoryसाखर कारखाने