शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिल्लक राहिलेला ऊस त्वरित तोडण्याचे आदेश द्या; जनहित याचिकेद्वारे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 11:55 IST

खंडपीठाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस, शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश

औरंगाबाद : राज्यात तोडणीवाचून शिल्लक असलेला ४० ते ५० टक्के ऊस त्वरित तोडण्याचा आदेश देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. याचिकेतील सर्व मुद्द्यांवर ६ आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने त्यांना दिले. ॲड. देवीदास आर. शेळके यांनी (पार्टी-इन-पर्सन) ही याचिका दाखल केली आहे.

राज्यात आणि मराठवाड्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली असून, ७ महिन्यांचा गळीत हंगाम संपला आहे. केवळ एक महिन्याचा कालावधी उरला आहे. नोंदीचा व बिगर नोंदीचा ४० ते ५० टक्के ऊस तोडणीवाचून शिल्लक आहे. ऊसतोड होत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. उसाच्या उताऱ्यात मोठी घट येत असल्याने शेतकऱ्यांचे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

केंद्र सरकारने नव्या कारखान्यासाठी अस्तित्वात असलेल्या कारखान्यापासून १५ कि.मी.च्या हवाई अंतराची अट घातली आहे. तर राज्य सरकारने २५ किमी हवाई अंतरात नवा कारखाना सुरू करण्यासाठी बंदी घातलेली आहे. मात्र कारखान्यांवर २५ किमी क्षेत्रातील ऊस तोडण्याचे बंधन घातलेले नाही. ही तरतूद घटनाबाह्य असून, ती रद्द करावी. २५ किमीच्या अटीमुळेच जास्त कारखाने उभे राहू शकले नसल्याने शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एकरी ४० टनाप्रमाणे भरपाई द्यावी. शेतकऱ्यांकडून ऊसतोडणी आणि वाहतुकीपोटी जी रक्कम घेण्यात आली, ती त्यांच्या एफआरपीमधून वजा करू नये. उतारा काढण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना सहभागी करून पारदर्शी करण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावेत. तसेच प्रशासनाला बिगर नोंदीच्या उसाची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गSugar factoryसाखर कारखाने