शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

क्रांतीचौक उड्डाणपुलावरील खड्डे  रस्ते विकास महामंडळाने बुजविण्याचे खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:40 IST

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने विविध कामांचा आढावा घेतला.

औरंगाबाद :  क्रांतीचौक उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले. 

खंडपीठात अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांच्या शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने विविध कामांचा आढावा घेतला. राज्य रस्ते विकास महामंडळाने क्रांतीचौक उड्डाणपुलावरील खड्डे बुजवावेत या खंडपीठाच्या आदेशामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.  शिवाजीनगर येथील रेल्वेलाईनखालून जाणारा भुयारी मार्ग तीन मीटर उंचीचा असावा की, चार मीटर, यावर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पाहणीत एकमत न झाल्याने यावर एकत्रित बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे म्हणणे सार्वजनिक बांधकाम विभागाने मांडल्यानंतर खंडपीठाने ते म्हणणे रेकॉर्डवर घेतले. 

क्रांतीचौक ते रेल्वे स्टेशन या २०१५ मध्ये व्हाईट टॅपिंगच्या ३० कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या रस्त्यावर ३९ कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाविरोधात अ‍ॅड. जैस्वाल यांनी खंडपीठात आक्षेप अर्ज दाखल केला. एकीकडे रस्ते बांधण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे एकाच रस्त्यासाठी ३९ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला जातो. हा निधीइतर  रस्त्यांवर खर्च करावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली. गोलवाडी  रेल्वे उड्डाणपुलाच्या सुनावणीत रेल्वेतर्फे अ‍ॅड. मनीष नावंदर यांनी सांगितले की, २० कोटी रुपयांच्या कामासाठी रेल्वेची एका विशेष समितीची परवानगी लागते.

अतिक्रमणाविरुद्ध कारवाई ; शासनाने मागितली माहिती शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात काय कारवाई केली, याबाबत शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत. पुढील सुनावणी ४ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौकhighwayमहामार्गAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ