शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून १३५३ कोटींची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 18:30 IST

खंडपीठाच्या आदेशाने जालना जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा

ठळक मुद्दे३ आठवड्यांत निर्णय घेण्याचे मुख्य सचिवांना आदेशजालना जिल्ह्यातील पीकविमा प्रकरण

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी ३ आठवड्यांत निर्णय घ्यावा व समितीने पंतप्रधान पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम सहा आठवड्यांत वाटप करावी, असे आदेश देत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे व न्या. आर.जी. अवचट यांनी याचिका निकाली काढली. यामुळे विमा कंपनीकडून १३५२.९१ कोटी रुपये परताव्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१८ या वर्षाकरिता जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ४ लाख १८ हजार ७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या संरक्षित क्षेत्रासाठी आयसीआयसीआय लिंबार्डो कंपनीने २५० कोटी ७३ लाखांचा पीकविमा जमा केला होता. त्याबदल्यात सातपट म्हणजे १३५२ कोटी ९१ लाख रुपयांचा पीकविमा मिळणे अपेक्षित होते; पण कंपनीने शेतकऱ्यांना केवळ ५५ कोटींचेच वाटप करून १९५ कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. यामधून अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले होते. पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. 

राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार व विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. शेतकऱ्यांना खरीप २०१८ मधील पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी मंगळवारी (दि.११) झाली. त्यात महाराष्ट्र शासनाने ३१ आॅगस्ट २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील १५१ तालुक्यांत गंभीर किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित केला होता. त्यात जालन्यातील मंठावगळता सातही तालुक्यांचा समावेश शासनाने केल्याचे पत्र टोपे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यांनी केलेले पत्रव्यवहार, त्याला शासनाकडून मिळालेले उत्तर, आयसीआयसीआय लिंबार्डो कंपनीला मिळालेला निव्वळ नफा, आदींचा ऊहापोह न्यायपीठासमोर झाला. त्यावर टोपे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केलेले निवेदन आता सुधारित स्वरूपात मुख्य सचिवांकडे दोन आठवड्यांत सादर करावे. त्यावर मुख्य सचिवांनी तीन आठवड्यांत विम्यासंदर्भात निर्णय घ्यावा व यासंदर्भातील समितीने पंतप्रधान पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम सहा आठवड्यांत वाटप करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकाकर्र्त्यांकडून अ‍ॅड.संभाजी टोपे यांनी, तर सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड.श्रीरंग दंडे यांनी काम पाहिले. 

जनहित याचिकेची रक्कम साई संस्थेलाजनहित याचिका दाखल करताना भरण्यात आलेली २५ हजार रुपयांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या औरंगाबाद येथील साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेला देण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAgriculture Sectorशेती क्षेत्र