शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

जालन्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून १३५३ कोटींची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 18:30 IST

खंडपीठाच्या आदेशाने जालना जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा

ठळक मुद्दे३ आठवड्यांत निर्णय घेण्याचे मुख्य सचिवांना आदेशजालना जिल्ह्यातील पीकविमा प्रकरण

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी ३ आठवड्यांत निर्णय घ्यावा व समितीने पंतप्रधान पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम सहा आठवड्यांत वाटप करावी, असे आदेश देत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे व न्या. आर.जी. अवचट यांनी याचिका निकाली काढली. यामुळे विमा कंपनीकडून १३५२.९१ कोटी रुपये परताव्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१८ या वर्षाकरिता जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ४ लाख १८ हजार ७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या संरक्षित क्षेत्रासाठी आयसीआयसीआय लिंबार्डो कंपनीने २५० कोटी ७३ लाखांचा पीकविमा जमा केला होता. त्याबदल्यात सातपट म्हणजे १३५२ कोटी ९१ लाख रुपयांचा पीकविमा मिळणे अपेक्षित होते; पण कंपनीने शेतकऱ्यांना केवळ ५५ कोटींचेच वाटप करून १९५ कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. यामधून अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले होते. पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. 

राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार व विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. शेतकऱ्यांना खरीप २०१८ मधील पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी मंगळवारी (दि.११) झाली. त्यात महाराष्ट्र शासनाने ३१ आॅगस्ट २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील १५१ तालुक्यांत गंभीर किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित केला होता. त्यात जालन्यातील मंठावगळता सातही तालुक्यांचा समावेश शासनाने केल्याचे पत्र टोपे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यांनी केलेले पत्रव्यवहार, त्याला शासनाकडून मिळालेले उत्तर, आयसीआयसीआय लिंबार्डो कंपनीला मिळालेला निव्वळ नफा, आदींचा ऊहापोह न्यायपीठासमोर झाला. त्यावर टोपे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केलेले निवेदन आता सुधारित स्वरूपात मुख्य सचिवांकडे दोन आठवड्यांत सादर करावे. त्यावर मुख्य सचिवांनी तीन आठवड्यांत विम्यासंदर्भात निर्णय घ्यावा व यासंदर्भातील समितीने पंतप्रधान पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम सहा आठवड्यांत वाटप करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकाकर्र्त्यांकडून अ‍ॅड.संभाजी टोपे यांनी, तर सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड.श्रीरंग दंडे यांनी काम पाहिले. 

जनहित याचिकेची रक्कम साई संस्थेलाजनहित याचिका दाखल करताना भरण्यात आलेली २५ हजार रुपयांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या औरंगाबाद येथील साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेला देण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAgriculture Sectorशेती क्षेत्र