शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

जालन्यातील शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून १३५३ कोटींची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 18:30 IST

खंडपीठाच्या आदेशाने जालना जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा

ठळक मुद्दे३ आठवड्यांत निर्णय घेण्याचे मुख्य सचिवांना आदेशजालना जिल्ह्यातील पीकविमा प्रकरण

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी ३ आठवड्यांत निर्णय घ्यावा व समितीने पंतप्रधान पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम सहा आठवड्यांत वाटप करावी, असे आदेश देत औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे व न्या. आर.जी. अवचट यांनी याचिका निकाली काढली. यामुळे विमा कंपनीकडून १३५२.९१ कोटी रुपये परताव्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१८ या वर्षाकरिता जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ४ लाख १८ हजार ७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या संरक्षित क्षेत्रासाठी आयसीआयसीआय लिंबार्डो कंपनीने २५० कोटी ७३ लाखांचा पीकविमा जमा केला होता. त्याबदल्यात सातपट म्हणजे १३५२ कोटी ९१ लाख रुपयांचा पीकविमा मिळणे अपेक्षित होते; पण कंपनीने शेतकऱ्यांना केवळ ५५ कोटींचेच वाटप करून १९५ कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. यामधून अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले होते. पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. 

राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार व विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. शेतकऱ्यांना खरीप २०१८ मधील पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी मंगळवारी (दि.११) झाली. त्यात महाराष्ट्र शासनाने ३१ आॅगस्ट २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील १५१ तालुक्यांत गंभीर किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित केला होता. त्यात जालन्यातील मंठावगळता सातही तालुक्यांचा समावेश शासनाने केल्याचे पत्र टोपे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यांनी केलेले पत्रव्यवहार, त्याला शासनाकडून मिळालेले उत्तर, आयसीआयसीआय लिंबार्डो कंपनीला मिळालेला निव्वळ नफा, आदींचा ऊहापोह न्यायपीठासमोर झाला. त्यावर टोपे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केलेले निवेदन आता सुधारित स्वरूपात मुख्य सचिवांकडे दोन आठवड्यांत सादर करावे. त्यावर मुख्य सचिवांनी तीन आठवड्यांत विम्यासंदर्भात निर्णय घ्यावा व यासंदर्भातील समितीने पंतप्रधान पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम सहा आठवड्यांत वाटप करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकाकर्र्त्यांकडून अ‍ॅड.संभाजी टोपे यांनी, तर सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड.श्रीरंग दंडे यांनी काम पाहिले. 

जनहित याचिकेची रक्कम साई संस्थेलाजनहित याचिका दाखल करताना भरण्यात आलेली २५ हजार रुपयांची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या औरंगाबाद येथील साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेला देण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAgriculture Sectorशेती क्षेत्र