शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईचे केवळ तीनच नमुने तपासणीला

By admin | Updated: October 28, 2014 00:59 IST

बीड : जिल्ह्यात ठिकठिकाणी निकृष्ट पध्दतीचे पदार्थ बाजारात विक्री केले जात आहेत़ दिवाळीच्या काळात अशा पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असते़

बीड : जिल्ह्यात ठिकठिकाणी निकृष्ट पध्दतीचे पदार्थ बाजारात विक्री केले जात आहेत़ दिवाळीच्या काळात अशा पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असते़ या काळात अन्न औषध प्रशासन विभागाने मिठाईचे केवळ तीनच नमुने तपासणीला घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते़ मिठाई बनविताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रत्येक वर्षी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून बाहेरगावाहून येणाऱ्या खव्याची तपासणी केली जाते़ मात्र यंदा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ तीनच नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ संपूर्ण जिल्ह्यातून तपासणीसाठी केवळ तीनच नमुने घ्यावेत ही बाब संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे़ बीड, अंबाजोगाई, परळी येथून मिठाईचे तीन नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत़ दिवाळीच्या काळात केवळ काम करत असल्याचे दाखविण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे नमुने ताब्यात घेतले की काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे़दरम्यान, दिवाळीनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणावर बँ्रडेड - नॉन बँ्रडेड मिठाई बाजारात विक्रीसाठी आली होती़ या मिठाईचे मानांकन काय आहे ? याची तपासणी अन्न सुरक्षा विभागाने केलेली नाही़ अन्न सुरक्षा अधिकारी कारवाई करत नसल्याने निकृष्ट दर्जाचे पदार्थ बाजारात सर्रास विक्री केले जात आहेत़ केवळ मिठाईच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट, बिस्कीटे आदी वस्तू बाजारात विकण्यास येत आहेत़ अन्न व औषध प्रशासन विभागात केवळ दोनच अधिकारी असल्याचे सांगितले जात असून कारवाईसाठी चालढकल केली जात आहे़ व्यापाऱ्यांवर या विभागाचा जरब नाही़ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी वर्षभरात फारशा कारवाया केल्या नसल्याचे समोर आले आहे़दोन वर्षापूर्वी धुळे येथून आलेला खवा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला होता़ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांची तपासणी केली जाते मात्र यंदा केवळ तीनच मिठाईचे नमुने घेतले आहेत़(प्रतिनिधी)दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तीन मिठाईचे नमुने घेतले असून त्याची तपासणी होणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांनी सांगितले़४केवळ तीन नमुने घेतल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे़४गणपती उत्सवादरम्यान घेतलेल्या तीन नमुन्यांप्रकरणी खवाविके्रत्यांवार कारवाई होणार आहे़