घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची मात्र पायपीट

By Admin | Updated: May 25, 2014 01:11 IST2014-05-25T01:01:33+5:302014-05-25T01:11:31+5:30

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यातील पांडुरणा गावालगत असलेल्या गारगोटवाडी येथे मागील ३५ वर्षांत पाणीपुरवठ्याच्या तीन योजना घेतल्या गेल्या खर्‍या,

Only the foothills of the villagers are for water | घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची मात्र पायपीट

घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची मात्र पायपीट

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यातील पांडुरणा गावालगत असलेल्या गारगोटवाडी येथे मागील ३५ वर्षांत पाणीपुरवठ्याच्या तीन योजना घेतल्या गेल्या खर्‍या, पण या योजनेचे पाणी उन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागविण्यास अपुरे पडले आहे़ यामुळे गावातील महिलांना अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात पायपीट करावी लागत आहे़ सदरील शेतकरी मारोती खुपसे यांनी आपल्या शेतातील पिके वाळवून पाईपलाईनने ग्रामस्थांना मार्च महिन्यापासून पाणी देत होते़ पण यांच्या विहिरीचे अधिग्रहण २९ एप्रिलपासून दाखविण्यात आल्याने या शेतकर्‍याने पाईपलाईनचे पाणी देणे बंद केले़ यामुळे ग्रामस्थांना आता अर्धा कि़मी़पेक्षा जास्त अंतरापर्यंत पाण्यासाठी डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे़ महिला व बच्चे कंपनीही पोटभर पाणी मिळावे म्हणून पायपीट करीत आहेत़ जनावरांचे काय? अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून ग्रामस्थांना पाणी मिळत असले तरी या गावातील जनावरांचा पाणीप्रश्न मात्र बिकट झाला आहे़ एक हजारच्या वर लोकवस्ती असलेल्या गारगोटवाडी गावात १९७३ च्या व १९९४ च्या वेळी दोन पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या़ या योजना आता कुचकामी ठरल्या आहेत़ यामुळे येथे २००८ ला भारत निर्माणमधून २१ लाख ८० हजारांचा निधी प्राप्त झाला असल्याने तिसरी योजना राबविण्यात आली़ या तिसर्‍या योजनेच्या विहिरीचे पाणी मार्च महिन्यातच संपले असल्याने ग्रामस्थांनी मारोती बाबूराव खुपसे यांच्या शेजारील विहिरीवरून पाणी आणतात़ गारगोटवाडी येथील ग्रामस्थांना मी मार्च महिन्यापासून पाणी देतोय़ पण माझ्या विहिरीचे अधिग्रहण मात्र २९ एप्रिलपासून दाखविण्यात आले आहे़ सरपंच व ग्रामसेवकांनी ठराव उशिरा घेवून माझ्यावर अन्याय केला़ माझी पिकेही वाळून गेली -मारोती खुपसे, शेतकरी़ गारगोटवाडी गावालगत गत पाच वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला़ पण यात एकदाही पाणी अडविण्याचा प्रयत्न झाला नाही़ या बंधार्‍यात पाणी अडवले गेले असते तर भारत निर्माणच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी पडले नसते - भिकू चव्हाण, शंकर राठोड (ग्रामस्थ)़

Web Title: Only the foothills of the villagers are for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.