शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

केवळ कायदे करून समाज बदलत नाही तर बदलासाठी समाज अनुकूल असावा लागतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:17 IST

केवळ कायदे करून समाज बदलत नाही. तर बदलासाठी समाज अनुकूल असावा लागतो, असे मत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

ठळक मुद्देमाजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचे मत

औरंगाबाद : केवळ कायदे करून समाज बदलत नाही. तर बदलासाठी समाज अनुकूल असावा लागतो, असे मत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.धर्मशास्त्र आणि नंतर धर्मात समाविष्ट झालेल्या विविध परंपरा, लिखित धार्मिक पुरावे यांचा साकल्याने विचार आणि घटनेतील धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्यासह या विषयांशी संबंधित विविध कलमांची सांगड घालूनच, शबरीमाला येथील मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, असे मत अणे यांनी व्यक्त केले.‘धर्माचरणाचा अधिकार आणि शबरीमाला प्रकरणाचा निकाल’ याविषयी अणे वकिलांना मार्गदर्शन करीत होते. मंचावर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल कराड, सचिव अ‍ॅड.कमलाकर सूर्यवंशी, उपाध्यक्ष अ‍ॅड. मंजूषा जगताप आणि अ‍ॅड. राम शिंदे उपस्थित होते.२८ सप्टेंबर २०१८ रोजी पाच न्यायमूर्तींच्या ‘घटनापीठाने’ बहुमताने १० ते ५० वर्षांच्या महिलांना आयप्पा मंदिरात प्रवेशास अनुकूलता दर्शविली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. फली नरिमन, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांनी हा निकाल दिला होता.शबरीमाला प्रकरणाच्या निकालाच्या सुमारे ५० वर्षांपूर्वीपासून विविध धार्मिकस्थळांशी संबंधित विविध रूढी, परंपरा आणि तेथील व्यवस्थापनाबाबतच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कालानुरूप निकाल दिले आहेत. सर्वप्रथम १९५४ साली ‘शिरूर मठ’ प्रकरण, त्यानंतर १९६० साली दर्गा अजमेर साहेब केसमध्ये ‘महिलांना मजारपर्यंत प्रवेशाचा प्रश्न’ तसेच सरदार सय्यदना ताहेर सैफुद्दीन प्रकरणात ‘धर्र्मातून वाळीत टाकण्याचा प्रश्न’, आचार्य जगदीश्वरानंद प्रकरणात आनंद मार्गींच्या ‘एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कवटी घेऊन तांडव नृत्याची परंपरा’, नाथद्वार मंदिर प्रकरण आणि महाराज नरेंद्र प्रसाद विरुद्ध गुजरात सरकार या प्रकरणांमध्ये ‘धर्माचा अधिकार’ याबाबत १९५४ ते २००४ पर्यंत काळानुरूप निकाल दिले गेले. त्यानंतर अनेक धर्मांची अनेक प्रकरणे न्यायालयासमोर येत गेली आणि घटनेतील धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक स्थळ व्यवस्थापन याशिवाय व्यक्तिस्वातंत्र्य, भेदभाव विरोधी कलम, धार्मिक आस्था आणि त्यांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य, अशा अनेक कलमांचा या प्रकरणात एकत्रित विचार करण्यात आला, असा संदर्भ अणे यांनी दिला. अ‍ॅड. कराड यांनी अणे यांचे स्वागत केले. अ‍ॅड. पूजा बनकर पाटील यांनी परिचय आणि कार्यक्रमाचे संचालन केले.--------------

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिलAurangabadऔरंगाबाद