शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

हिरापूर परिसरात नुसत्याच टोलेजंग इमारती; पण ड्रेनेज अन् कचऱ्याची बोंब

By साहेबराव हिवराळे | Updated: February 6, 2024 11:25 IST

एक दिवस एक वसाहत: सिडकोकडे कराच्या माध्यमातून ९ कोटींच्या जवळपास निधी पडून आहे; परंतु सिडकोने या झालर क्षेत्रात कोणताही विकास केलेला नाही.

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडच्या कडेला चिकलठाणा हद्दीत असलेल्या हिरापूर परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या खऱ्या पण सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने रिकामे भूखंड डबके बनले आहेत. मोकाट कुत्री, डुकरे अन् सरपटणारे प्राणी दिवसाआड नागरिकांच्या दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाहीत. झालर क्षेत्रातील विकासाचे वांधे झाले असून, अनेकदा जीव मुठीत धरूनच कामगारांना घर गाठावे लागत आहे.

सिडकोकडे कराच्या माध्यमातून ९ कोटींच्या जवळपास निधी पडून आहे; परंतु सिडकोने या झालर क्षेत्रात कोणताही विकास केलेला नाही. सामान्य नागरिक तसेच कामगार कुटुंबीयांनी या भागात घरे घेतलेली असून, त्यांना मूलभूत सेवासुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. फक्त घराचे निर्माण कार्य काढण्यासाठी सातत्याने सिडकोकडूनच परवानगी घेणे रास्त होते. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी सिडकोकडे कर अदा करून रीतसर परवानग्या घेतलेल्या आहेत. परंतु सेवासुविधा पुरविण्याच्या नावाने हात वर केले असल्याचे निदर्शनास येत आहे. हिरापूर परिसरातील मूलभूत समस्यांसाठी टाहो फोडावा तो कुणाकडे, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.

घरासमोर सरपटणारे प्राणी...सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सेफ्टी टँक बनवून त्या पाण्याचा निचरा करण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. पावसाळ्यात ज्या प्रमाणे पावसाचे पाणी तुंबते, त्याच प्रमाणे १२ महिने ड्रेनेजचे सांडपाणी रिकाम्या प्लाॅटवर तुंबलेले असते. त्यात उगवलेली झाडेझुडपे मोठी झाली आहेत. त्यात वराह व सापांच्या प्रजाती आढळून येत आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. ही स्वच्छता करण्याची जबाबदारी सिडकोची की ग्रामपंचायतीची, असा प्रश्न पडतो.- विष्णू गायकवाड, रहिवासी

रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी....हिरापूर परिसरातील वसाहतीचे सांडपाणी जयहिंदनगरी परिसरात सातत्याने वाहत असून या पाण्यातून विद्यार्थी व कामगारांना रस्ता ओलांडावा लागत आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी येतात, परंतु काही करीत नाहीत. मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी तर एकदाही परिसरात भेट दिलेली नाही. ड्रेनेजलाइन टाकून सांडपाण्याचा निचराही बिल्डरने केलेला नाही. उलट सांडपाणी उघड्यावर सोडून एक प्रकारे थट्टा केलेली आहे.- सुधाकर शेळके, रहिवासी

या जबाबदाऱ्या कोणाच्या?जयहिंदनगरी मनपा हद्दीत असून हिरापूर येथे नव्याने टोलेजंग उभारलेला हा परिसर आहे. बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. कचरागाडी येत नाही तर तो स्वत:च जाळून टाकावा लागतो. सिडको, मनपा, ग्रामपंचायत यापैकी लक्ष देणार कोण?-सुनीता नवघरे, रहिवासी

कुमकुवत वीज बोअरवेलही चालत नाही...परिसरात जागा घेऊन घरे बांधली; परंतु घरातील वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने असतो. त्यामुळे पाणीपुरवठा करणारे बोअरवेलही अत्यंत कमी दाबाने चालतात. अनेकदा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीकडे महावितरण विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. वीज गुल झाल्यावर मोठी पंचाईत होते, एकूणच स्थिती अवघड आहे.- सुरेश देशमुख, रहिवासी

केरकचऱ्याचे ढिगारे...प्रत्येक ग्रामपंचायत किंवा मनपाकडे कचरा गोळा करणारी वाहने असतात. कर्मचारी सफाई करण्यासाठी पाठविले जातात, परंतु या परिसराकडे कुणीही फिरकत नाही. पावसाळ्यातच नव्हे तर बारा महिने सांडपाणी वाहते.-उद्धव देशमुख, रहिवासी

सिडकोने विकास करावा, अन्यथा रक्कम द्यावी...झालर क्षेत्रात हिरापूर परिसर असल्याने करापोटी सिडकोकडे जमा ९ कोटींच्या जवळपास रक्कम असून त्यातून कोणताही विकास केला गेला नाही. रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न त्यातून मार्गी लावण्यासाठी ही रक्कम ग्रामपंचायतीला परत द्यावी, अशी मागणी केलेली आहे.-उपसरपंच विठ्ठल सुंदर्डे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका