शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाथसागरात २१ टक्केच पाणीसाठा; पैठणमध्ये होतोय ८२ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 20:03 IST

पैठण तालुक्यात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था येथील गावांची झाली आहे.

ठळक मुद्देनाथसागरात २१ टक्केच पाणीसाठा; पैठणमध्ये होतोय ८२ टँकरने पाणीपुरवठा मार्चमध्ये पाणीबाणी सामना  आगामी काळात पाणीकपातीची शक्यता 

- समीर पठाण  

जायकवाडी : नाथसागर धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सध्या साठा २१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालन्यासह उद्योगांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल हे जवळपास निश्चित आहे. मार्चमध्ये धरण मृतसाठ्यात जाणार असल्याने पाणीबाणीचा सामना करावा लागेल. विशेष म्हणजे पैठण तालुक्यात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था येथील गावांची झाली आहे. आजघडीला ८२ खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालन्यासह परळी विद्युत प्रकल्प, चार हजार उद्योग, तर नगर जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, यंदा कमी पर्जन्यमानामुळे हिवाळ्यातच जायकवाडी धरणातील पाणीसाठा २१ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाणीकपातीची शक्यता आहे. जायकवाडी धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चपर्यंत पिण्यासाठी धरणातील पाणी मिळणार आहे. मात्र, यानंतर मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. 

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा यंदाच्या पावसाळ्यात ४६ टक्के एवढा झाला होता. त्यातही शेतीला सलग पाणीपुरवठा करण्यात आल्याने आता धरणात केवळ २१ टक्केपाणी असून, याच पाण्यात येत्या पावसाळ्यापर्यंत तहान भागवावी लागणार आहे.नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडले असले तरी ८.९९ पैकी केवळ ४.६० टीएमसी पाणीच जायकवाडीत पोहोचले आहे, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.  

७५ गावांची तहान टँकरवर पैठण तालुक्यात ७५ गावांना ८२ टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. दिवसेंदिवस पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीला मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत टँकरचा आकडा शंभरी पार करील, अशी शक्यता आहे.

जायकवाडीत बिगर सिंचन पाणीपुरवठाजायकवाडी धरणातील दरवर्षी जवळपास ३२७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो. त्यात पिण्यासाठी १०५ दशलक्ष घनमीटर, औद्योगिक वसाहती ३४ दशलक्ष घनमीटर, तर परळी औष्णिक विद्युत प्रकल्प १८८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा समावेश आहे, तर एमआयडीसीला दररोज ५०.५ एमएलडी पाणीपुरवठा होता. त्यात वाळूज एमआयडीसीसाठी ३५ एमएलडी, चिकलठाणा ८ एमएलडी, शेंद्रा एमआयडीसी ५.२५ एमएलडी, जालना एमआयडीसी ०.८० एमएलडी, तर १ टीएमसी माजलगाव धरणासाठी पाणीपुरवठा झाला.

मार्च अखेर मृतसाठा गाठणार जायकवाडी धरणात सध्या २१ टक्केपाणीसाठा शिल्लक असून पाणीवाटप धोरणानुसार २२ तारखेपासून सध्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाला १ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. मार्चअखेरपर्यंत धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यात जाईल, अशी माहिती जायकवाडी धरणाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीdroughtदुष्काळ