शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

कांद्याचे पीक बहरले

By | Updated: December 6, 2020 04:04 IST

घाटनांद्रा : यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेरी हडोळ पाझर तलाव तुडुंब भरला असून, विहिरींसह जमिनीतील पाणी पातळीत ...

घाटनांद्रा : यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेरी हडोळ पाझर तलाव तुडुंब भरला असून, विहिरींसह जमिनीतील पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांबरोबरच यंदा गावरान कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे कांद्याचे पीकही चांगलेच बहरले आहे. कांदा हे सर्वात जास्त पाण्याचे पीक म्हणून ओळखले जाते. यंदा या परिसरात पाणी मुबलक प्रमाण आहे. दरवर्षी बाजारपेठेत कांद्याला भावही चांगला असल्याने व उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी गावरान कांद्याला पसंती दिली आहे. पाणी असल्यामुळे लागवड केलेले काद्यांचे पीक सध्या बहरत आहे.

येथील अमोल चौधरी, कारभारी मोरे, गणेश मालोदे या शेतकऱ्यांनी दोन एकर शेतजमिनीवर एकरी तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे कांदा बी खरेदी करून त्याची लागवड शेतशिवारात केली आहे. खरिपातील कांद्याने यंदा शेतकऱ्यांना दगा दिला होता. बुरशीजन्य आजारामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. कांद्याची पातही वाढीस लागली नाही. एकरी फक्त चार ते पाच क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे त्यातून लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. कपाशी, मका, सोयाबीन या पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले. खरिपातील कसर रबीत काढण्यासाठी शेतकरी यंदा कांदा लागवडीकडे वळले आहेत. कांदा हे नगदी पीक असल्याने परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचा कांद्याचे पीक घेण्याकडे कल आहे.

घाटनांद्रा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेले कांद्याचे पीक बहरात आले आहे. (छायाचित्र दत्ता जोशी).