शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

औरंगाबाद मनपाच्या अजब त-हा; कचरा तुंबल्याचा राग काढला सफाई मजुरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 13:40 IST

कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.

ठळक मुद्दे शहरात मागील चार महिन्यांपासून कचरा पडून आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले आहेत.

औरंगाबाद : शहरात मागील चार महिन्यांपासून कचरा पडून आहे. जागोजागी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हजारो मेट्रिक टन कचरा पावसाच्या पाण्याने अक्षरश: सडून दुर्गंधी पसरली आहे. ज्याठिकाणी कचऱ्याच्या पर्वतरांगा उभारण्यात आल्या आहेत, त्या भागातील नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत असतानाही महापालिका प्रशासन काहीच धोरणात्मक निर्णय घेण्यास तयार नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेला कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी उचलून टाकावा कुठे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कचरा न उचलल्याने एका सफाई मजुरावर थेट निलंबनाची कारवाई सोमवारी महापालिका आयुक्तांनी केली. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष आहे.

नारेगाव येथे चार महिन्यांपासून कचरा टाकणे बंद आहे. शहरातील कचऱ्याची स्थिती सफाई मजूर आपल्या पद्धतीने रेटून नेत आहेत. काही वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून कचऱ्यावर प्रक्रियाही करण्यात येत आहे. २,५०० सफाई मजुरांच्या मेहनतीमुळे शहरात अद्याप तरी रोगराई पसरलेली नाही. वेळोवेळी कचरा उचलून ठिकठिकाणी टाकणे, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मदत करणे, आदी कामे मनपाच्या सफाई मजुरांनीच केली.  शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने घाटी रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा पडून होता. या भागात मनपा आयुक्तY डॉ. निपुण विनायक गेले असता त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. महापालिकेची घंटागाडी येत नाही म्हणून आम्ही कचरा नाईलाजास्तव रोडवर टाकतो, असेही नागरिकांनी सांगितले. त्यावरून या भागातील सफाई मजूर गौतम बबन कांबळे याला सोमवारी  निलंबित करण्यात आले.

निरीक्षक, वॉर्ड अधिकाऱ्यांना अभयमनपा प्रशासनाने कचराप्रश्नी एकट्या सफाई मजुरावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घाटी रोडवरील जयभीमनगर परिसरात घंटागाडी येत नाही, हे पाहण्याचे काम स्वच्छता निरीक्षकाचे आहे. त्यानेही कर्तव्यात कसूर केल्यास वॉर्ड अधिकारी आहेत. या दोघांना अभय का देण्यात आले. त्यांच्यावरही कारवाई करायला हवी होती, असे मनपातील कामगार संघटनांचे म्हणणे आहे. 

एका वॉर्डासाठी तीन रिक्षाजयभीमनगर घाटी या वॉर्डासाठी मनपा प्रशासनाने तीन रिक्षा दिल्या आहेत. कंत्राटदाराच्या या रिक्षा असून, एका रिक्षाचे भाडे दरमहा २९ हजार रूपये देण्यात येत आहे. तीन रिक्षांचे दरमहा भाडे जवळपास ९० हजार रूपये  होते. या भागात कचरा नेणारी रिक्षाच येत नसेल तर त्याला दोषी सफाई मजूर कसा? कंत्राटदार रिक्षा न पाठविता बिल वसूल करतोय का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्न