भूसंपादनामुळे कोळवाडीत एकाची आत्महत्या
By Admin | Updated: August 21, 2015 00:44 IST2015-08-21T00:14:20+5:302015-08-21T00:44:05+5:30
बीड: तालुक्यातील कोळवाडी येथील जमीन संपादनात जात असल्याच्या कारणावरुन विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

भूसंपादनामुळे कोळवाडीत एकाची आत्महत्या
बीड: तालुक्यातील कोळवाडी येथील जमीन संपादनात जात असल्याच्या कारणावरुन विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मोहन गोपीनाथराव कांगरे (वय ५९ रा. करचुंडी. ता. बीड) हे परिवहन महामंडळात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, धुळे-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या रस्त्यावरील कोळगाव भागात त्यांची जागा आहे. त्यांची जागा वळणावर असल्याने त्यांची संपुर्ण जागा या कामासाठी जात आहे. दोन्ही बाजूने जागा घ्यावी असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले असल्याचे त्यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले.
त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. बीड ग्रामीण ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद रात्रीपर्यंत झाली नव्हती. दुष्काळापाठोपाठ आता संपादनामुळेही आत्महत्या होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)