शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगरात १ लाख अनधिकृत नळ कनेक्शन; वर्षाला मनपाचा १०० कोटींचा कर बुडतोय

By मुजीब देवणीकर | Updated: January 29, 2024 14:50 IST

कनेक्शन अधिकृत का होत नाहीत? प्रशासकीय हेकेखोर वृत्तीमुळे दरवर्षी पाणीपुरवठ्यात किमान १०० कोटींचा तोटा सहन करावा लागतोय.

छत्रपती संभाजीनगर : शहरात एक लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी एखादा सभ्य नागरिक मनपात गेला तर त्याला एवढी किचकट प्रक्रिया दाखविली जाते की, परत आलाच नाही पाहिजे. एखाद्याने जिद्दीने अर्ज केलाच तर त्याची चप्पल झिजेपर्यंत परवानगी द्यायची नाही, अशी शपथच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेली असते. प्रशासकीय हेकेखोर वृत्तीमुळे दरवर्षी पाणीपुरवठ्यात किमान १०० कोटींचा तोटा सहन करावा लागतोय.

खंडपीठाने तीन वर्षांपूर्वी महापालिकेला अनधिकृत नळ कनेक्शनचा शोध घ्या, असे आदेश दिले. आता खंडपीठाचे आदेश म्हटल्यावर कारवाई तर करणे भागच आहे. युद्धपातळीवर अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली. त्यातील एक पथक कागदावर तर दुसरे पथक अधूनमधून कारवाई करीत असते. एखाद्या स्लम वसाहतीत अनधिकृत नळ सापडले तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही; पण सिडको एन-४ सारख्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये मागील आठवड्यात तब्बल १९ नळ कनेक्शन खंडित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. उच्चभ्रू वसाहतीतही अनधिकृत नळ असतात, यावर शिक्कामोर्तब झाले.

नळ अधिकृत करण्याची प्रक्रियासर्वसामान्य नागरिकाने वॉर्ड कार्यालयात अर्ज द्यायचा असतो. हा अर्ज पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येतो. पाणीपुरवठा विभाग अधिकृत प्लंबरमार्फत फाइल सादर करा, असे सांगतात. अधिकृत प्लंबर अर्जदाराला फोन करून सर्व कागदपत्र मागून घेतो. सोबत एकूण ‘खर्च’ही त्याला सांगतो. ही रक्कम जवळपास पाच ते सहा हजारांपर्यंत असते. अर्जदाराने ‘होकार’ दिला तरच फाइल मंजूर होते, अन्यथा नाही.

मालमत्ता कर आहे, पाणीपट्टी नाहीशहरात एक लाखांहून अधिक घरांना मालमत्ता कर लावलेला आहे, मात्र पाणीपट्टी वसुली केली जात नाही. दरवर्षी कर वसुलीसाठी मनपा कर्मचारी संबंधित नागरिकाकडे जातात. त्याच्याकडे नळ कनेक्शन आहे, हे उघडपणे दिसत असूनही पाणीपट्टीबद्दल ब्र अक्षरही काढत नाहीत. नळ अधिकृत आहे का अनधिकृत, एवढे विचारण्याची तसदी घेत नाहीत.

सर्वसाधारण सभेचे आदेश धाब्यावरआठ वर्षांपूर्वी मनपा सर्वसाधारण सभेने अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी फक्त एक हजार रुपये शुल्क आकारून नळ अधिकृत करून द्यावा, असा ठराव घेतला आहे. या ठरावानुसार आजपर्यंत एकही नळ अधिकृत करून दिलेला नाही.

तीन हजार २५ रुपये घेतोसर्वसाधारण सभेने सांगितल्यानुसार एक हजार रुपये, चालू आर्थिक वर्षाची पाणीपट्टी दाेन हजार २५ रुपये असे मिळून तीन हजार २५ रुपये घेऊन आपण नळ अधिकृत करून देतो. जिथे नवीन जलवाहिनी टाकली तेथे पावती पाहून कनेक्शन देतोय. त्यामुळे दरमहा २५ ते ३० अर्ज नवीन कनेक्शनसाठी येतात.-के.एम. फालक, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTaxकरWaterपाणी