शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

१०८ रुग्णवाहिकेमुळे मिळाले दीड लाख रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 13:12 IST

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत दीड लाख रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाल्याने जीवदान मिळाले.

औरंगाबाद : आरोग्य विभागाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात पाच वर्षांत दीड लाख रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाल्याने जीवदान मिळाले. विशेष म्हणजे पाच वर्षांत रुग्णवाहिकेच्या लाभार्थ्यांची संख्या ३७ हजारांनी वाढली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी या रुग्णवाहिकेच्या सेवेला सुरुवात झाली. जिल्ह्यात ८ अत्याधुनिक जीवनप्रणाली आणि २३ प्राथमिक जीवनप्रणाली असलेल्या अशा एकूण ३१ रुग्णवाहिका आहेत. अपघातात जखमी, जळीत, विषबाधा झालेले रुग्ण, गरोदर माता यांच्यासह विविध आपत्कालीनप्रसंगी गरजूंना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होते.  जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिकांसाठी ७० आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिकारी व ७१ आपत्कालीन सहायक नियुक्त आहेत. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा समन्वयक ओमकुमार कोरडे, विभागीय व्यवस्थापक तुषार भोसले, जिल्हा व्यवस्थापक डॉ. अमोल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू आहे. जिल्ह्यात २०१४ मध्ये ९ हजार २२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला होता. यामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ही संख्या २०१५ मध्ये १५ हजार ६३७, २०१६ मध्ये २७ हजार २९९, २०१७ मध्ये ३३ हजार ७८५ तर  यंदा सप्टेंबरपर्यंत ४६ हजारांवर पोहोचली आहे. पाच वर्षांत १ लाख ३३ हजार ३०० रुग्णांना या सेवेमुळे जीवदान मिळाले. 

१२ हजार जखमींना मदतअपघातात जखमी झालेल्या रुग्णांसाठी पहिला एक तास महत्त्वाचा असतो. या तासाभरात आवश्यक उपचार मिळाल्यास धोका टळतो. १०८ रुग्णवाहिकेने गेल्या पाच वर्षांत अपघातात जखमी झालेल्या १२ हजार २५३ रुग्णांना व ३४ हजार ४३५ गर्भवती महिलांना तातडीने मदत पोहोचविली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल