शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

औरंगाबाद विमानतळावर तस्करीचे १ कोटीचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 12:16 IST

दिल्लीहून आलेल्या विमानातील दोन तस्करांकडून सुमारे एक कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. 

ठळक मुद्देअबुधाबीहून आणली होती ३ किलो सोन्याची बिस्किटेतस्करी करणारे दोन जण ताब्यात शहरातील पहिलीच मोठी कारवाई

औरंगाबाद  : येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री दिल्लीहून आलेल्या विमानातील दोन तस्करांकडून सुमारे एक कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. दिल्लीहून रात्री ८ वाजता औरंगाबादला आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील शेख जावेद आणि अब्दुल फईम (रा. मुंबई) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सुमारे एक कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त करण्याची ही औरंगाबादेतील पहिलीच वेळ आहे. 

कस्टमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जावेद आणि शेख फय्युम यांनी अबुधाबीवरून ही सोन्याची बिस्किटे आणल्याची माहिती मिळाली. मुंबई कस्टमच्या अधिकाऱ्यांना हे दोन प्रवासी औरंगाबादमध्ये सोने घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून कस्टमचे अधिकारी औरंगाबादमध्ये आधीच येऊन थांबले होते. ही माहिती पक्की करण्यासाठी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी केंद्रीय जीएसटीच्या अधिकाऱ्यांची, त्याचप्रमाणे महसूल विभागाचीही मदत घेतली होती. 

रात्री विमानतळावर दोन्ही सोनेतस्कर उतरले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दोघांच्या बॅग्जची तपासणी केली असता त्यामध्ये हे सोने आढळले. ८ वाजेपासून ते रात्री १२.३० वाजेपर्यंत या प्रकरणात दोघांची चौकशी चालू होती. या चौकशीदरम्यान विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी वगळता कुणालाही विमानतळाच्या आतील बाजूस प्रवेश देण्यात आला नाही. 

शहरात या घटनेची माहिती कळताच माध्यमांचे प्रतिनिधी विमानतळावर धावले. विमानतळाच्या आतील भागात दोघांची चौकशी चालू होती. काही वेळाने सोनेतस्करीची माहिती मिळाली. आधीच्या माहितीनुसार दहा कोटी रुपयांची बिस्किटे असल्याचे समजले. मात्र, नंतर ही बिस्किटे तीन किलो वजनाची व सुमारे एक कोटी रुपयांची असल्याचे समोर आले. औरंगाबादमध्ये मंगळवारी सोन्याचा दर हा ३२ हजार १०० रुपये इतका होता. या आकडेवारीनुसार या सोन्याची किंमत सुमारे ९६ लाख रुपयांपेक्षाही अधिक होत आहे. 

शेख जावेद आणि शेख फय्युम हे दोघे औरंगाबादमध्ये कुणासाठी सोने घेऊन आले होते किंवा कुणाकडे ते सोपविणार होते, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, या दोघांनी आणलेले सोने हे तस्करी करून आणल्याचे समोर येत आहे. कस्टम कायद्याखाली या दोघांवर कारवाई होणार असून, ते दोघे कस्टम अधिकाऱ्यांच्याच ताब्यात राहणार आहेत.

अशी लपविली बिस्किटेया दोन तस्करांनी एका बिस्किटाचे चार तुकडे करून ती सर्व बिस्किटे एका बॅगमध्ये लपविली होती. बिस्किटाचे तुकडे पॅक करून त्याचा रोल तयार करण्यात आला होता. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांना या दोघांकडे सोने असल्याची पक्की खात्री असल्याने या दोघांची तपासणी केली असता तस्करी उघडकीस 

दोन्ही गेट केले बंदसोनेतस्करांची चौकशी चालू असताना विमानतळ प्राधिकरणाकडून जालना रस्त्यावरील दोन्ही मुख्य गेट बंद करण्यात आले होते. रात्री ८ वाजता औरंगाबाद शहरात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना बाहेर जाऊ दिल्यानंतर हे गेट बंद करण्यात आले.

कस्टमचा नियम कस्टमच्या नियमानुसार विदेशातून एका पुरुषाला २० हजारांचे, तर महिलेला ४० हजार रुपयांचे सोने आपल्यासोबत आणता येते. त्यापेक्षा जास्त सोने आणण्यास मनाई आहे. असे सोने आणल्यास ते जप्त करण्यात येते व कस्टम विभाग नंतर त्याचा लिलाव करून तो पैसा सरकार दरबारी जमा केला जातो. यामुळे आता शेख जावेद आणि अब्दुल फईम या दोन तस्करांकडून जप्त केलेल्या सोन्याचाही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लिलाव होईल. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळSmugglingतस्करीGoldसोनंGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयPoliceपोलिस