शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे अवकाळीने सडविले, दुसरीकडे बाजारभावाने रडविले; कांद्यामुळे शेतकरी मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 11:56 IST

कांदा पिकाने आणले फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

फुलंब्री : तालुक्यात नुकतेच दोन ते तीन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडविली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून सडला आहे, तर बाजारात भाव नसल्याने काहींचा कांदा चाळीत सडत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

फुलंब्री तालुक्यात मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे जमिनीत पाणीपातळी चांगली असल्याने यंदा रबी, तसेच उन्हाळी पिकांमध्ये वाढ झाली. यंदा चांगला भाव मिळेल या आशेने तालुक्यातील बाराशे शेतकऱ्यांनी ८०० एकर क्षेत्रात कांदा लागवड केल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर लागवड केली, त्यांचे पीक शेतातून घरात आले. मात्र, ज्यांनी उशिरा लागवड केली, त्यांचे पीक नैसर्गिक संकटात सापडले आहे. सध्या काही दिवसांपासून वादळी, वारे, गारपिटीसह अवकाळी पाऊस होत असून, यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जमिनीच्या बाहेर काढून ठेवलेला कांदा ओला होऊन सडला आहे, तर दुसरीकडे भाव मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

एकरी ५० हजार रुपये खर्चकांदा लागवड करण्यापासून काढणीपर्यंत प्रतिएकर ५० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे. यात शेती तयार करणे, लागवड करणे, बियाणे, खते, औषधी फवारणी, खुरपणी काढणी आदींचा समावेश आहे. असा खर्च झालेला असताना शेतकऱ्यांना मात्र लावलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

बाजारातील भावही गडगडलेमागील वर्षी कांदा पिकाला प्रतिक्विंटल दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, सध्या कांदा दरात मोठी घसरण झाली असून, ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.

कांदा साठवणीची अडचणतालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यातील मोजक्या शेतकऱ्यांकडेच कांदा साठवणीकरिता चाळ उपलब्ध आहेत. इतर शेतकऱ्यांना कांदा काढणीनंतर साठवणीसाठी व्यवस्था नसल्याने तो तत्काळ बाजारात विक्रीसाठी न्यावा लागतो. यामुळे दर कमी असले तर याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

२२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसानफुलंब्री तालुक्यात यंदा ४११ हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड झालेली होती. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने प्राथमिक माहितीनुसार ९० हेक्टर म्हणजे २२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे केले जात आहेत.- भारत कासार, तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस