शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

एकीकडे अवकाळीने सडविले, दुसरीकडे बाजारभावाने रडविले; कांद्यामुळे शेतकरी मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 11:56 IST

कांदा पिकाने आणले फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

फुलंब्री : तालुक्यात नुकतेच दोन ते तीन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडविली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून सडला आहे, तर बाजारात भाव नसल्याने काहींचा कांदा चाळीत सडत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

फुलंब्री तालुक्यात मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे जमिनीत पाणीपातळी चांगली असल्याने यंदा रबी, तसेच उन्हाळी पिकांमध्ये वाढ झाली. यंदा चांगला भाव मिळेल या आशेने तालुक्यातील बाराशे शेतकऱ्यांनी ८०० एकर क्षेत्रात कांदा लागवड केल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर लागवड केली, त्यांचे पीक शेतातून घरात आले. मात्र, ज्यांनी उशिरा लागवड केली, त्यांचे पीक नैसर्गिक संकटात सापडले आहे. सध्या काही दिवसांपासून वादळी, वारे, गारपिटीसह अवकाळी पाऊस होत असून, यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जमिनीच्या बाहेर काढून ठेवलेला कांदा ओला होऊन सडला आहे, तर दुसरीकडे भाव मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

एकरी ५० हजार रुपये खर्चकांदा लागवड करण्यापासून काढणीपर्यंत प्रतिएकर ५० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे. यात शेती तयार करणे, लागवड करणे, बियाणे, खते, औषधी फवारणी, खुरपणी काढणी आदींचा समावेश आहे. असा खर्च झालेला असताना शेतकऱ्यांना मात्र लावलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

बाजारातील भावही गडगडलेमागील वर्षी कांदा पिकाला प्रतिक्विंटल दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, सध्या कांदा दरात मोठी घसरण झाली असून, ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.

कांदा साठवणीची अडचणतालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यातील मोजक्या शेतकऱ्यांकडेच कांदा साठवणीकरिता चाळ उपलब्ध आहेत. इतर शेतकऱ्यांना कांदा काढणीनंतर साठवणीसाठी व्यवस्था नसल्याने तो तत्काळ बाजारात विक्रीसाठी न्यावा लागतो. यामुळे दर कमी असले तर याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

२२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसानफुलंब्री तालुक्यात यंदा ४११ हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड झालेली होती. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने प्राथमिक माहितीनुसार ९० हेक्टर म्हणजे २२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे केले जात आहेत.- भारत कासार, तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस