शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

एकीकडे अवकाळीने सडविले, दुसरीकडे बाजारभावाने रडविले; कांद्यामुळे शेतकरी मेटाकुटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 11:56 IST

कांदा पिकाने आणले फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

फुलंब्री : तालुक्यात नुकतेच दोन ते तीन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडविली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजून सडला आहे, तर बाजारात भाव नसल्याने काहींचा कांदा चाळीत सडत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

फुलंब्री तालुक्यात मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे जमिनीत पाणीपातळी चांगली असल्याने यंदा रबी, तसेच उन्हाळी पिकांमध्ये वाढ झाली. यंदा चांगला भाव मिळेल या आशेने तालुक्यातील बाराशे शेतकऱ्यांनी ८०० एकर क्षेत्रात कांदा लागवड केल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर लागवड केली, त्यांचे पीक शेतातून घरात आले. मात्र, ज्यांनी उशिरा लागवड केली, त्यांचे पीक नैसर्गिक संकटात सापडले आहे. सध्या काही दिवसांपासून वादळी, वारे, गारपिटीसह अवकाळी पाऊस होत असून, यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जमिनीच्या बाहेर काढून ठेवलेला कांदा ओला होऊन सडला आहे, तर दुसरीकडे भाव मिळेल या आशेने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

एकरी ५० हजार रुपये खर्चकांदा लागवड करण्यापासून काढणीपर्यंत प्रतिएकर ५० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे. यात शेती तयार करणे, लागवड करणे, बियाणे, खते, औषधी फवारणी, खुरपणी काढणी आदींचा समावेश आहे. असा खर्च झालेला असताना शेतकऱ्यांना मात्र लावलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

बाजारातील भावही गडगडलेमागील वर्षी कांदा पिकाला प्रतिक्विंटल दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, सध्या कांदा दरात मोठी घसरण झाली असून, ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.

कांदा साठवणीची अडचणतालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यातील मोजक्या शेतकऱ्यांकडेच कांदा साठवणीकरिता चाळ उपलब्ध आहेत. इतर शेतकऱ्यांना कांदा काढणीनंतर साठवणीसाठी व्यवस्था नसल्याने तो तत्काळ बाजारात विक्रीसाठी न्यावा लागतो. यामुळे दर कमी असले तर याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

२२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसानफुलंब्री तालुक्यात यंदा ४११ हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड झालेली होती. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने प्राथमिक माहितीनुसार ९० हेक्टर म्हणजे २२५ एकर क्षेत्रातील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे केले जात आहेत.- भारत कासार, तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस