शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:05 AM

महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २०१५ मध्ये २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला होता. या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. शासनाने रस्त्याच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता शोधून काढण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २०१५ मध्ये २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला होता. या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. शासनाने रस्त्याच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता शोधून काढण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली आहे. त्यामुळे महापालिका अधिका-यांचे धाबे अधिक दणाणले आहेत.शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने महापालिकेला २४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून गजानन महाराज मंदिर ते जय भवानीनगर, सेव्हनहिल ते सूतगिरणी चौक, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, संत तुकोबानगर व क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आणि मनपाने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यातील क्रांतीचौक ते महावीर चौक हा रस्ता वगळता इतर रस्त्यांची कामे करण्यात आली. निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. समितीचे अध्यक्ष हे प्रधान सचिव आहेत, तर मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुहास शिंदे व नगर विकास विभागाचे उपसचिव हे सदस्य आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून १० जूनपर्यंत अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.शासनाने समिती नियुक्त केल्याने महापालिका अधिका-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. यापूर्वी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी या अनियमितता प्रकरणी दोषी अधिका-यांवर निलंबनाची कारवाईसुद्धा केली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका