कृषी अधिकाऱ्यांस घेराव
By Admin | Updated: June 13, 2015 23:49 IST2015-06-13T23:49:39+5:302015-06-13T23:49:39+5:30
आष्टी: परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात मोठ्या कृषीकेंद्र चालक प्रमाणात चढ्या दराने बियाणाची विक्री करत असल्याने

कृषी अधिकाऱ्यांस घेराव
आष्टी: परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात मोठ्या कृषीकेंद्र चालक प्रमाणात चढ्या दराने बियाणाची विक्री करत असल्याने याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी कृषी अधिकारी यांना घेराव घालून याबाबात जाब विचारला.
तालुक्यात मृगनक्षत्राचा पाऊस जोरदार पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरीही मोठ्या आशेवर बियाणाची खरेदी करतांना दिसून येत आहे. याचाच फायदा परिसरातील कृषी केंद ्रचालकांनी चालविला आहे. बियाणाच्या पिशवीपेक्षा जादा दराने बियाणाची विक्री करत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बियाणाचा कृत्रीम तुटवडा भासवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही कृषी केंद्रचालक करत आहेत.
या बाबात वारंवार कृषी अधिकाऱ्यांना सुचना देवूनही याकडे दुर्लंक्ष होत असल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.
तालुका कृषी अधिकारी व्हि.जी.कांबळे, गुण नियत्रंक एस.आर.पोटे आर.टी.तेलंग यांच्या पथकाने आष्टीला शनिवारी भेट दिली असता शेतकऱ्यांनी याबाबात कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली. आणि बियाणाचा होणार काळाबाजार रोखण्याची मागणी केली. (वार्ताहर)
आधीच दुष्काळोन पछाडलेल्या शेतकऱ्याना पावसाने दिलासा दिला आहे. चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतु कृषी केंद्रचालकांनी मोठ्या प्रमाणात बियाणाची चढ्या दराने विक्री करत असल्याने शेतकरी हैराण आहेत. ९३० रूपये अजित या वाणाची बियाणाची पिशवी पहिल्यांदा किमंत होती. शासनाने ती १०० रूपये कमी करून ८३० रूपयांना विकण्याची सक्ती केली आहे. परंतु कृषीकेंद्रचालक बियाणाचा तुटवडा असल्याची बतावणी करून एक बियाणाची पिशवी १ हजार रूपयापर्यत विकत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यान बघण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.