शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची संख्या घटली

By admin | Updated: August 25, 2014 00:25 IST

चालू आठवड्यात टँकरची संख्या २६ ने कमी झाली आहे.

औरंगाबाद : आठवडाभरातील पावसामुळे जिल्ह्यातील काही गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. त्यामुळे या गावात पाणीपुरवठा करणारे टँकर बंद करण्यात आले आहेत. परिणामी, चालू आठवड्यात टँकरची संख्या २६ ने कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या २९७ टँकरने २१९ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. पैठण तालुक्यातील २४ आणि सिल्लोड तालुक्यातील २, असे एकूण २६ टँकर कमी झाले आहेत. आतापर्यंत पावसाळा असूनही टँकरचा आलेख सतत वर चढत होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात २३४ गावांना ३२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता; परंतु गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पैठण आणि सिल्लोड तालुक्यांतील काही गावांमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला आहे. म्हणून प्रशासनाने या गावांतील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद केले आहेत. सध्या जिल्ह्यातील चारशे गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. यापैकी सव्वादोनशे गावांना टँकरने, तर उर्वरित पावणेदोनशे गावांना अधिग्रहित विहिरींद्वारे पाणी पुरविले जात आहे.