शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आता पर्यटन व्यावसायिकांच्याही होतील शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 4:55 PM

पर्यटन सुरू करावे, यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आतापर्यंत नानाप्रकारे शासनाला साकडे घातले आहे

ठळक मुद्दे औरंगाबादच्या पर्यटनावरच हा अन्याय का?

औरंगाबाद : अवघ्या भारतातील पर्यटन स्थळे सुरू झाली. महाराष्ट्रातही रायगड किल्ला, एलिफंटा केव्ह सुरू झाल्या. मग जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे असलेल्या अजिंठा- वेरूळ लेणीबाबतच हा अन्याय का, असा सवाल औरंगाबादच्या पर्यटन व्यावसायिकांनी केला. तसेच आता जर पर्यटन स्थळे  सुरू झाली नाहीत, तर शेतकऱ्यांप्रमाणे पर्यटन व्यावसायिकांच्याही आत्महत्या झाल्याच्या बातम्या ऐकाव्या लागतील, अशा शब्दात पर्यटन क्षेत्रातील भीषणता समोर आणली. 

आता तरी शासनाने पर्यटन जगताची हाक ऐकून पर्यटन स्थळे सुरू करावीत, या मागणीसाठी औरंगाबादच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्वच संस्थांतर्फे शुक्रवार, दि. २७ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. टूर ऑपरेटर जसवंत सिंह राजपूत, रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेल असोसिएशनचे सुनील चौधरी, एलोरा गाइड असोसिएशनचे आमोद बसोले, अजिंठा गाइड असोसिएशनचे अबरार हुसैन, शॉपकिपर्स ॲण्ड हॉटेल असोसिएशनचे मकरंद आपटे, शॉपकिपर असोसिएशनचे पपिंद्रपार यांची उपस्थिती होती.

काळ्या फिती लावून निषेधपर्यटन व्यावसायिकांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पर्यटन सुरू करावे, यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आतापर्यंत नानाप्रकारे शासनाला साकडे घातले आहे; परंतु या मागण्यांकडे सर्रास कानाडोळा केला जात असल्याने दि. २७ रोजी सकाळी ११ वा. पर्यटन व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून व्हर्च्युअल निषेध नोंदविला. पर्यटनातील १८ असोसिएशनचे सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते.

सर्व सुरू झाले; पर्यटन मागे का?सर्व धार्मिक स्थळे सुरू झाली, चित्रपट गृहे, जीम, हाॅटेल, मॉल व जलतरण तलावही सुरू झाले. मग आमच्यावरच हा अन्याय का, असा सवाल पर्यटन व्यावसायिकांनी उठविला. 

पत्रकारांच्या हस्ते चित्रफितीचे उद्घाटनकोरोनानंतर पर्यटन व्यावसायिकांची बिकट अवस्था सांगणाऱ्र्या पर्यटन  व्यावसायिकांनी बनविलेल्या चित्रफितीचे उद्घाटन वरिष्ठ पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. ही चित्रफीत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच आता लवकरच अजित पवार व शरद पवार यांनाही साकडे घालण्यात येईल, असेही त्रस्त व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन