शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

आता रेल्वेप्रवास होणार वेगवान, मनमाड ते औरंगाबाद लोहमार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:17 IST

स्टेशनवर केबल टाकण्याचे काम सुरू : फेब्रुवारीपर्यंत जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या ...

स्टेशनवर केबल टाकण्याचे काम सुरू : फेब्रुवारीपर्यंत जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य

औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनमाड (अंकाई) ते औरंगाबाददरम्यान विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेस्टेशनवर सध्या विद्युत खांबांवर केबल टाकण्याचे काम सुरू झाले असून, महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. येत्या अडीत ते तीन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत औरंगाबादपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले होते. त्यानुसार हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. औरंगाबादेत खांब (पोल) उभारण्यात आल्यानंतर विद्युत यंत्रणेचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीरीत्या झाली आहे.

औरंगाबादहून लवकरच चाचणीविद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्युतीकरण पूर्ण होत असल्याने रेल्वे रुळाच्या परिसरातील नागरिकांना, रेल्वे गेटमधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन