शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

आता सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांचे घरीच विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 1:17 PM

सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना होम क्वारंटाईन करण्यावर प्रशासकीय यंत्रणेचे एकमत

ठळक मुद्देसुविधा असणाऱ्या रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्धप्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत

औरंगाबाद : नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण (होम क्वारंटाईन) होता येणार आहे. पुढील सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी दिली. होम क्वारंटाईन करण्याबाबत आजवर प्रशासनात समन्वयाचा अभाव होता. होम क्वारंटाईनचा निर्णय लवकर न घेतल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ज्या घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे  असतील त्यांची स्वतंत्र मोठी घरे आहेत, तसेच ग्रामीण भागातही ज्यांच्या शेतात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे प्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत होईलच, शिवाय रुग्णांना सोयीचे होणार आहे. 

लोकप्रतिनिधींच्या सूचना अशा - खा. कराड म्हणाले, कोविड केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या दररोज भेटी देण्यावर भर द्यावा. - खा. जलील म्हणाले, घाटी रुग्णालयामध्ये मनुष्यबळाचा अभाव दिसून येत असून, तात्काळ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी. - आ. बागडे यांनी कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जाण्यास त्रास होत असून, आंबेडकर चौक ते पिसादेवी हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली. - आ. दानवे म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.  - आ. सावे म्हणाले, वाळूज येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील कामगारांची अँटिजन टेस्टची संख्या वाढविण्यात यावी. - आ. जैस्वाल यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची व हर्सूल तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद