शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आता डोळ्यांसमोर काजवे चमकतच नाहीत ! शेतातील रसायनांनी घालविला काजव्यांचा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 15:33 IST

रासायनिक खतांची फवारणी, वृक्षतोड, घटलेले पर्जन्यमान, वाहने तसेच कारखान्यांमधून येणारे दूषित वायू या गोष्टी काजव्यांना मराठवाड्यापासून दूर घेऊन गेल्या आहेत.

ठळक मुद्देआता सध्या जिथे काजवे दिसतात, त्या प्रांतात तरी रसायनांचा वापर कमी करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी करत आहेत.कोरडे हवामान असतानाही काही वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर काजवे दिसायचे.

औरंगाबाद : ' डोळ्यांपुढे काजवे चमकणे ' हा वाक्प्रचार जरी नकारात्मक अर्थाने वापरला जात असला तरी जेव्हा खरेखुरे काजवे डोळ्यांसमोर चमकत असतात, तेव्हा ते दृश्य अतिशय विहंगम दिसते. मराठवाड्यातही पूर्वी काजवे चमकायचे. पण शेतीसाठी रसायनांचा बेसुमार वापर सुरू झाला आणि कधीकाळी चमचमणारे काजवे आता जणू गायबच होऊन गेले.

मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याचा सुरुवातीचा काळ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी पर्वणीच. खंडाळा घाट, भंडारदरा, अकोले तालुका, सातारा, सांगलीचा काही भाग म्हणजे लखलखत्या काजव्यांचे नंदनवन. या दिवसांमध्ये हा प्रांत रात्रीच्या वेळी काजव्यांच्या लकाकणाऱ्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो. हे अवर्णनीय दृश्य पाहण्याच्या ओढीने याकाळात हजारो पर्यटक पश्चिम महाराष्ट्र गाठतात आणि काजवा महाेत्सवाचा आनंद घेतात. काजवे हे प्रामुख्याने जास्त आर्द्रता असणाऱ्या प्रदेशात दिसतात. परंतु मराठवाड्यातही काही वर्षांपूर्वीपर्यंत काजव्यांच्या काही जाती अगदी सहज दिसायच्या. पण रासायनिक खतांची फवारणी, वृक्षतोड, घटलेले पर्जन्यमान, वाहने तसेच कारखान्यांमधून येणारे दूषित वायू या गोष्टी काजव्यांना मराठवाड्यापासून दूर घेऊन गेल्या आहेत. आता सध्या जिथे काजवे दिसतात, त्या प्रांतात तरी रसायनांचा वापर कमी करावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी करत आहे.

काजवे का चमकतात ?काजवा हा कीटक वर्गात येतो. काजव्याच्या शेपटीखाली असणाऱ्या अवयवात ल्युसिफेरीन नावाचा द्रव पदार्थ असतो. नायट्रीक ऑक्साईड, कॅल्शियम यांच्या मदतीने ल्युसिफेरीनची ऑक्सिजनसोबत प्रक्रिया होते आणि काजवे प्रकाशमान होतात. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि अन्नाच्या शोधासाठी नर आणि मादी दोघेही प्रकाशमान होत असतात. काजव्यांचे अनेक प्रकार असून या प्रकारानुसार त्यांचा प्रकाशही पांढरा, पिवळा, हिरवा, केशरी अशा विविध रंगात पडत असतो.

रासायनिक खतांचा बेसुमार वापरकोरडे हवामान असतानाही काही वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर काजवे दिसायचे. शहरी भागातही अनेकांनी काजव्यांचे चमकणे पाहिले आहे. परंतु आता मात्र ग्रामीण भागातही क्वचितच काजवे चमकताना दिसतात. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे शेतीसाठी रासायनिक खतांचा होणारा बेसुमार वापर. काजवे, मधमाशा यांच्यासह अनेक कीटकांवर रासायनिक खतांच्या माऱ्याचा वाईट परिणाम झाला आहे. काजव्यांचे न दिसणे म्हणजे रसायनांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढल्याचे सूचक आहे.- डॉ. सतीश पाटील, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद