शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आता पुन्हा गद्दारांचे झेंडे हाती घ्यायला लावू नका; बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:00 IST

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

औरंगाबाद : शिवसेनेत असताना गद्दारी करतात, पुन्हा पक्षात येतात. आता ते गद्दार पुन्हा पक्षात आले, तर त्यांचे झेंडे धरायला आणि सतरंज्या उचलायला लावू नका, असा जोरदार इशारा शिवसैनिकांनी रविवारी शहागंजमधील बाळाजी धर्मशाळेत झालेल्या मेळाव्यात दिला.

मध्य मतदारसंघातील आ. प्रदीप जैस्वाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी हातमिळवणी करीत सरकारमध्ये सामील झाले. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ.अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, बंडू ओक, अनिल पोलकर, मोहन मेघावाले, आनंद तांदूळवाडीकर, राजू पहाडिया, राजू इंगळे यांच्यासह महिला आघाडीच्या प्राजक्ता राजपूत आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिंदे यांच्या गटाला जवळ केले आहे. त्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. गावांत-वॉर्डात अनेकांशी शत्रुत्व घेत पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आणि त्यांनी स्वार्थासाठी बंडखोरी करायची. शिवसैनिकांकडून निष्ठेची अपेक्षा करायची आणि बंडखोरी करणाऱ्यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची, या प्रकारामुळे सामान्य शिवसैनिकांचे अवसान गळाले आहे. 

आ. दानवे म्हणाले, पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत. ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे कार्यालयातील फोटो काढून फेका. त्यांना यापुढे विधानसभा दिसायला नको. शहरप्रमुख बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी कोळशाच्या खाणीतून आणून हिऱ्यासमान आकार दिला. चकाकी मिळाली की, शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राचा गळा या बंडखोरांनी घोटला. ॲड. पहाडिया म्हणाले, यापुढे निष्ठावंतांचा विचार झाला पाहिजे. बंडखोरांविरोधात अनेकांनी भावना व्यक्त करीत एकतेची वज्रमूठ आवळली.

दोन्ही आमदारांवर खैरेंची टीकाशिवसेना नेते खैरे म्हणाले, आ. जैस्वाल यांना दोनवेळा मदत केली. तरीही त्यांनी बंडखोरी केली. आ. संजय शिरसाटांवर टीका करताना खैरे यांनी ‘रिक्षाचालकाकडे इतका पैसा आला कुठून’, असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली, ती सगळी कामे घरच्यांनाच वाटली. एकही काम शिवसैनिकांना दिले नाही. पैसा आयुष्यभर पुरत नाही, असेही खैरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ