शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

आता भगतसिंगगिरी सुरु, कुठल्याही क्षणी मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:21 IST

पुणतांबा येथे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा 'शेतकरी संपा'ची हाक देण्याबाबत निर्णय होणार

छत्रपती संभाजीनगर: पक्ष, जातीपातीमध्ये न अडकता आमचा शेतकरी एकत्र आला आहे, हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. सात दिवस उपोषण,आठ दिवस पदयात्रा काढली तरी सरकारला जाग येत नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी आता गांधीगिरी संपली असून यापुढील आंदोलन भगतसिंगगिरीने करू, मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू, असा इशारा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला. शहरातील प्रहारच्या चक्काजाम आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

शेतकरी कर्जमाफी व्हावी, शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, या मागण्यांसाठी प्रहारतर्फे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरात देखील क्रांतीचौक येथे प्रहारने  सकाळपासून भर पावसात आंदोलन सुरु केले. यावेळी कॉंग्रेस, मनसे,एमआयएम आदी पक्षांनी आंदोलनास साथ दिली. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळी येत सरकारवर ताशेरे ओढले. आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू. येथून थेट पुणतांबा येथे जात असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा 'शेतकरी संपा'ची हाक देण्याबाबत निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. आंदोलनानंतर बच्चू कडू पोलिसांच्या स्वाधीन झाले.

आता कुठल्याही क्षणी मंत्रालयात घुसू बच्चू कडू पुढे म्हणाले, निवडणुकीवेळी सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले. आता म्हणत आहेत पिक चांगले आहे. पिक चांगले असले तरी त्याला भाव चांगला नाही, याचा विचार करावा. आमची रास्त मागणी असून सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंदोलनापूर्वी अनेकांना ताब्यात घेतले गेले. अतिशय वाईट पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली. आता गनिमी कावा करून मेंढ्यासह थेट मंत्रालयात घुसू , असा इशारा देत कडू यांनी निर्णायक लढा सुरु झाल्याचे स्पष्ट केले.

पुन्हा शेतकरी संपाची चाचपणीसध्या कृषीमंत्र्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सरकारने तेवढेच प्रयत्न शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी करावेत. शेतकरी मुद्द्यावर अनेक पक्ष आमच्या सोबत आहेत. येथे राजकारण आणू नये, येथे शेतकरी हा विषय महत्वाचा आहे. बनवाबनवीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या हुशारीने करतात. त्यांना असे वाटते की, लोकांना आपण मूर्ख बनवू, एकवेळ तुम्ही आम्हाला मूर्ख बनवा पण शेतकऱ्यांना बनवू नका. कारण शेतकऱ्यांचे हात थांबले तर अन्न मिळणार नाही. त्यामुळे तुम्हीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी कडू यांनी केली.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र