तीन ग्रा.पं.ना ‘पाटबंधारे’ची नोटीस

By Admin | Updated: April 3, 2015 00:38 IST2015-04-03T00:25:03+5:302015-04-03T00:38:54+5:30

भारज : जाफराबाद तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी नोटिसा बाजावल्या आहेत. या गावांना जीवरेखा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

Notice of 'Water Damage' for three gram panchayat | तीन ग्रा.पं.ना ‘पाटबंधारे’ची नोटीस

तीन ग्रा.पं.ना ‘पाटबंधारे’ची नोटीस


भारज : जाफराबाद तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पाटबंधारे विभागाने थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी नोटिसा बाजावल्या आहेत.
या गावांना जीवरेखा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शासनाच्या बिगर सिंचन योजनेमार्फत या गावांना प्रकल्पातील पाणी सोडण्यात येते. या पाण्याची पट्टी संबंधित ग्रामपंचायतींना भरावी लागते. मात्र पाटबंधारे विभागाने अनेकवेळा मागणी करूनही ग्रा.पं.ने पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाटी पट्टी मोठ्या प्रमाणात थकलेली आहे. त्यामुळे भारज बु., भारज खु. व आढा या तिन्ही ग्रा.पं.ची पाणी पट्टी भरण्यासंबधी नोटीस बजावली.
तर पाणी पुरवठा बंद
तिन्ही ग्रा.पं.ने येत्या १५ दिवसाच्या आत थकीत पाणी पट्टी न भरल्यास संबंधित गावांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारेचे सहा. अभियंता यांनी दिला आहे.

Web Title: Notice of 'Water Damage' for three gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.