शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

पाऊस नव्हे, अंदाजही ढगातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:23 AM

हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज खोटे ठरवत पावसाने ढगातच दडी मारल्याने मराठवाड्यातील शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

मयूर देवकर ।औरंगाबाद : हवामान खात्याने वर्तविलेले सर्व अंदाज खोटे ठरवत पावसाने ढगातच दडी मारल्याने मराठवाड्यातील शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.मान्सूनचे अनुमान काढताना हवामान खात्य२ाने यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकित वर्तविले होते. यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच मान्सून नेहमीपेक्षा आधी येणार, राज्यात धो धो पाऊस पडणार, असे आशादायी वातावरण निर्माण करण्यात आले होते. ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. २ किंवा ३ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असे सांगण्यात आले; पण सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून केरळमध्येच रेंगाळला. जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार रोहिण्या बरसल्यामुळे हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसालाच मान्सून घोषित करण्याची घाई करून शेतकºयांना खोटी आशा दाखवली. पाऊस दाखल झाला असे समजून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खरिपाची लागवड केली. वेळेच्या आता पाऊस दाखल होण्याचे भाकित खोटे ठरवून जून महिन्याच्या मध्यावर मान्सून बरसला. त्यामुळे शेतकºयांचे खूप नुकसान झाले.१४ व १५ जून रोजी औरंगाबादमध्ये ७४.६ मि.मी. पाऊस पडला. त्यानंतर मराठवाड्यात पावासाने १५ दिवस दड२२ी मारली. असे एकामागे एक पावसाचे अनुमान चुकत गेले. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. पाण्याअभावी पिके करपू लागली. शेतीकामे, खते, बी-बियाणे, डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा कात्रीत सापडून बळीराजा हवालदिल झाला. काही शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये खरीप पेरणीत अंदाजे २ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे अनुमान आहे.जुलै महिना तर शेतकºयांची अग्निपरीक्षा पाहणाराच ठरला. मुंबईतील कुलाबा वेधशाळेने १५ जुलैनंतर मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन होण्याची घोषणा केली. परंतु ही आशादेखील फोल ठरली. औरंगाबामध्ये १० जुलैनंतर आजतागायत एकदाही दिवसभरात ८ मि.मी पाऊसदेखील पडलेला नाही. पिकांनी माना टाकल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची समस्या निर्माण झाली आहे.>पावसाचा अंदाज आणि वस्तुस्थितीयंदा ९६ टक्के पाऊस पडेल सध्या तरी तशी स्थिती नाही२ किंवा ३ जून रोजी मान्सूनचे आगमन अंदाज चुकला, मान्सून केरळमध्येच रेंगाळला१५ जुलैनंतर मराठवाड्यात पाऊस अंदाज खोटा ठरला२०१५ साली ९३ टक्के पाऊस प्रत्यक्षात ८६ टक्के पाऊस२०१३ साली ९८ टक्के पाऊस प्रत्यक्षात १०६ टक्के पाऊस>शेतकºयांची न्यायालयात धाव : हवामान खात्याच्या लहरी अनुमानांना कंटाळून माजलगाव तालुक्यातील गंगाभीषण थावरे या शेतकºयाने दिंदू्रड पोलीस ठाण्यात कुलाबा व पुणे वेधशाळांनी शेती उत्पादन कंपन्यांशी मिळून खोटे अंदाज वर्तवून शेतकºयांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकºयांनीदेखील खोट्या भाकितांमुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यामुळे या वेधशाळांविरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती.>१९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीचे भाकीतपुणे वेधशाळेने १९ आॅगस्ट रोजी मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुमारे ५० दिवस ओढ दिल्यानंतर आता तरी ढग बरसतील, अशी आशा निर्माण झाली आहे.