शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उतारवयातच नाही, लहान मुलालाही पक्षाघाताचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:46 IST

पक्षाघात ही स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराचा एक किंवा अधिक भाग हालचाल करणे अशक्य होतो.

छत्रपती संभाजीनगर : पक्षाघात फक्त वयस्क लोकांनाच होतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र, हा समज चुकीचा आहे. लहान मुलांनाही पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे मुलांमधील कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

पक्षाघात म्हणजे काय?पक्षाघात ही स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराचा एक किंवा अधिक भाग हालचाल करणे अशक्य होतो. यामध्ये स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण नसते. याचे मुख्य कारण म्हणजे मज्जातंतू प्रणालीतील अडथळा किंवा नुकसान. पक्षाघात तात्पुरता किंवा कायम स्वरूपी असू शकतो. पक्षाघात हे मृत्यू आणि अपंगत्वाचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

पक्षाघात कशामुळे येतो?मेंदूच्या रक्ताभिसरणामध्ये अचानक उद्भवलेल्या बदलांमुळे पक्षाघात होतो. त्यामध्ये कधी रक्तवाहिन्या बंद पडतात तर कधी फुटून रक्तस्राव होतो. अत्यंत तीव्र इन्फेक्शन, जखमा किंवा अपघात, मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) किंवा डोक्याला इजा. आनुवंशिक आजार आदींमुळे पक्षाघात होऊ शकतो.

बचावासाठी काय कराल?स्ट्रोकपासून बचावासाठी सात्विक अन्न, नियमित व्यायाम आणि धूम्रपानासारख्या हानिकारक सवयींपासून दूर राहण्याची स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे त्यांनी योग्य वैद्यकीय उपचाराद्वारे या स्थितींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.

तपासण्या कोणत्या?पक्षाघाताची शंका असल्यास मेंदू आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांची छायाचित्रे घेण्यासाठी सीटी स्कॅन किंवा एमआरआयची आवश्यकता असते.

लहान मुलांचे प्रमाण ५ टक्केलहान मुलांमध्येही पक्षाघात पाहायला मिळतो. पक्षाघाताचे १०० रुग्ण असतील तर त्यात लहान मुलांचे प्रमाण हे ५ ते ६ टक्के असते. लहान मुलांमध्ये जेनेटिक डिसिजमुळे पक्षाघात होतो. लहान मुलांना काहीच होत नाही, असे समजू नये. लहान मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.- डाॅ. इस्तियाक अन्सारी, न्यूरो सर्जन

उच्च रक्तदाब, मधुमेहाने धोकाउच्च रक्तदाब, मधुमेह, आणि उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या आधुनिक जीवनशैलीच्या रोगांमुळे स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. मेंदूच्या टीबीसारख्या काही संसर्गामुळे पक्षाघात होऊ शकतो. ‘सेरेब्रोव्हास्क्युलर ऑक्सिडेंट’ हा शब्द स्ट्रोकच्या आकस्मिक, अपघाती स्वरूपाचे लक्षण दर्शवतो. जरी सर्व अपघात टाळता येत नसतात. परंतु योग्य पावले उचलून बरेच अपघात टाळता येऊ शकतात किंवा त्यापासून होणारी हानी कमी करता येते.- डाॅ. मकरंद कांजाळकर, न्यूरोफिजिशियन

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य