शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उतारवयातच नाही, लहान मुलालाही पक्षाघाताचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:46 IST

पक्षाघात ही स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराचा एक किंवा अधिक भाग हालचाल करणे अशक्य होतो.

छत्रपती संभाजीनगर : पक्षाघात फक्त वयस्क लोकांनाच होतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र, हा समज चुकीचा आहे. लहान मुलांनाही पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे मुलांमधील कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

पक्षाघात म्हणजे काय?पक्षाघात ही स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराचा एक किंवा अधिक भाग हालचाल करणे अशक्य होतो. यामध्ये स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण नसते. याचे मुख्य कारण म्हणजे मज्जातंतू प्रणालीतील अडथळा किंवा नुकसान. पक्षाघात तात्पुरता किंवा कायम स्वरूपी असू शकतो. पक्षाघात हे मृत्यू आणि अपंगत्वाचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

पक्षाघात कशामुळे येतो?मेंदूच्या रक्ताभिसरणामध्ये अचानक उद्भवलेल्या बदलांमुळे पक्षाघात होतो. त्यामध्ये कधी रक्तवाहिन्या बंद पडतात तर कधी फुटून रक्तस्राव होतो. अत्यंत तीव्र इन्फेक्शन, जखमा किंवा अपघात, मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) किंवा डोक्याला इजा. आनुवंशिक आजार आदींमुळे पक्षाघात होऊ शकतो.

बचावासाठी काय कराल?स्ट्रोकपासून बचावासाठी सात्विक अन्न, नियमित व्यायाम आणि धूम्रपानासारख्या हानिकारक सवयींपासून दूर राहण्याची स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे त्यांनी योग्य वैद्यकीय उपचाराद्वारे या स्थितींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.

तपासण्या कोणत्या?पक्षाघाताची शंका असल्यास मेंदू आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांची छायाचित्रे घेण्यासाठी सीटी स्कॅन किंवा एमआरआयची आवश्यकता असते.

लहान मुलांचे प्रमाण ५ टक्केलहान मुलांमध्येही पक्षाघात पाहायला मिळतो. पक्षाघाताचे १०० रुग्ण असतील तर त्यात लहान मुलांचे प्रमाण हे ५ ते ६ टक्के असते. लहान मुलांमध्ये जेनेटिक डिसिजमुळे पक्षाघात होतो. लहान मुलांना काहीच होत नाही, असे समजू नये. लहान मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.- डाॅ. इस्तियाक अन्सारी, न्यूरो सर्जन

उच्च रक्तदाब, मधुमेहाने धोकाउच्च रक्तदाब, मधुमेह, आणि उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या आधुनिक जीवनशैलीच्या रोगांमुळे स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. मेंदूच्या टीबीसारख्या काही संसर्गामुळे पक्षाघात होऊ शकतो. ‘सेरेब्रोव्हास्क्युलर ऑक्सिडेंट’ हा शब्द स्ट्रोकच्या आकस्मिक, अपघाती स्वरूपाचे लक्षण दर्शवतो. जरी सर्व अपघात टाळता येत नसतात. परंतु योग्य पावले उचलून बरेच अपघात टाळता येऊ शकतात किंवा त्यापासून होणारी हानी कमी करता येते.- डाॅ. मकरंद कांजाळकर, न्यूरोफिजिशियन

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य